भात अवस्था ः फुलोरा ते दाणे भरणे अवस्था
निमगरवे भात दाणे भरण्याच्या अवस्थेत व गरवे भात फुलोरा अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत ठेवावी. हळवे भात पक्व होऊ लागल्यास कापणीपूर्वी ८-१० दिवस भात खाचरातील पाणी बाहेर काढून टाकावे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता दिसत आहे. पावसाचा अंदाज घेवून तयार झालेल्या हळव्या भात पिकाची सकाळच्या वेळेस “वैभव” विळ्याच्या साह्याने जमिनीलगत कापणी करावी. कापणीनंतर त्वरीत मळणी करून साठवणीआधी २ ते ३ उन्हे देऊन धान्य वाळवावे. वाढते ऊन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे वरकस आणि उतार असलेल्या जमिनीतील हळव्या जातीच्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पावसाचा अंदाज घेऊन तयार झालेल्या हळव्या भात पिकाची कापणी उरकून घ्यावी. वाढते ऊन आणि मध्येच ढगाळ वातावरण अशा वातावरणामुळे पाणी साचून राहणाऱ्या शेतातील निम गरव्या आणि गरव्या भात पिकावर तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या पिकाचे सातत्याने सर्वेक्षण करून तपकिरी तुडतुड्यांच्या प्रादुर्भावावर सातत्याने लक्ष ठेवावे. जर रोपाच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास, फवारणी प्रतिलिटर पाणी फिप्रोनिल (५ टक्के प्रवाही) २ मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मि.ली. टीप : फवारणी करताना कीटकनाशक चुडाच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच खाचरात पाणी जास्त काळ न साठवता फोडून पुन्हा नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. जास्त हवामान आर्द्रतेच्या काळात जास्त पालवी असलेल्या झाडांवर बुरशीची वाढ झालेली असते. सद्य:स्थितीतील वाढणाऱ्या तापमानामुळे सदर बुरशीची वाढ जोमाने होऊन फांदी मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फांदी मर रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने गोळा करून नष्ट करावीत. रोगट फांद्या कापून काढाव्यात. अशा कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. अशाप्रकारे बागेची स्वच्छता केल्यावर पावसाची उघडीप असताना संपूर्ण झाडावर फवारणी करावी. (प्रमाण -प्रतिलिटर पाणी) मेटॅलक्झील (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के) (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम. वाढत्या तापमानामुळे आंब्याच्या नवीन येणाऱ्या पालवीवर तुडतुडे, शेंडे पोखरणारी आणि मिजमाशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पालवीचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी, पावसाची उघडीप असताना फवारणी प्रतिलिटर पाणी, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली. किंवा क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २.५ मि.ली. जास्त हवामान आर्द्रतेच्या काळात जास्त पालवी असलेल्या झाडांवर बुरशीची वाढ झालेली दिसून येते. सद्य:स्थितीतील वाढणाऱ्या तापमानामुळे सदर बुरशीची वाढ जोमाने होऊन फांदी मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. फांदी मर रोगाच्या नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने गोळा करून नष्ट करावीत. रोगट फांद्या कापून काढाव्यात. अशा कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी. अशाप्रकारे बागेची स्वच्छता केल्यावर पावसाची उघडीप असताना संपूर्ण झाडावर फवारणी करावी. (प्रमाण -प्रतिलिटर पाणी) वाढत्या तापमानामुळे काजूच्या नवीन येणाऱ्या पालवीवर ढेकण्या व फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पालवीचे किडींपासून संरक्षण करण्यासाठी नवीन पालवी फुटण्याच्या वेळी, फवारणी प्रतिलिटर पाणी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.ली. नारळ अवस्था ः फळधारणा नारळावरील इरीओफाईड कोळीच्या प्रादुर्भावामुळे फळाच्या देठाखालच्या भागात पांढरट, पिवळे, त्रिकोणी चट्टे दिसून येतात. नंतर चट्टे वाढत जाऊन त्रिकोणी आकाराचे होतात. प्रादुर्भावित भागावरील फळांचे आवरण तडकते. परिणामी, नारळ लहान राहतात. लहान फळांची गळ होते. या किडीच्या नियंत्रणासाठी ५ टक्के कडूनिंबयुक्त (ॲझाडीरेक्टीन) कीटकनाशक ७.५ मि.ली. समप्रमाणात पाण्यात मिसळून मुळाद्वारे ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात द्यावे. हे द्रावण मुळांद्वारे दिल्यानंतर ४५ दिवसापर्यंत नारळ काढू नयेत. याशिवाय नारळावर कडुनिंबयुक्त कीटकनाशक (१ टक्का) ४ मि. ली. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे नारळाच्या घडावर पडेल, अशी फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व कीडग्रस्त व तयार नारळ काढून घ्यावेत. पडलेली फळे, फुलोरा गोळा करून नष्ट करावेत. संपर्क ः ०२३५८ -२८२३८७ (कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)