पिकांची उगवण झाल्यावर सर्वसाधारण १५ ते २० दिवसांनंतर पिकांमध्ये ४ ते ६ ओळीनंतर बळीराम नांगर अथवा कोळप्याच्या मदतीने सऱ्या काढाव्यात. यामुळे सुरवातीस पडलेला पाऊस सऱ्यांमध्ये साठविला जाऊन पाण्याची उपलब्धता वाढते. उत्पादनात १५-२० टक्के वाढ होते. बऱ्याचवेळा सरासरी एवढा पाऊस झाला तरी नेमका पीकवाढीच्या संवेदनशील अवस्थेत पावसाचे १ ते २ खंड आढळून येतात. हे पावसाचे खंड बऱ्याचवेळा जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात आढळून येतात. हा पावसाचा अनियमितपणा किंवा खंड पिकांच्या सुरवातीच्या अवस्थेत, पिकांच्या मध्यावस्थेत आणि पक्वतेच्या काळातसुद्धा येऊ शकतो आणि त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. सर्वसाधारणपणे पाऊस नेहमीपेक्षा उशिरा सुरू होणे, पाऊस नेहमीपेक्षा लवकर बंद होणे, पाऊस वेळेवर सुरू होणे व मध्येच मोठा खंड पडणे आणि अतिवृष्टी होणे अशाप्रकारे कोणतीही एक आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्या मराठवाडा विभागात अनेक ठिकाणी पावसाचा खंड आढळून येत आहे. काही ठिकाणी वेळेवर पेरणी झाली त्याठिकाणी पिकांची वाढ समाधानकारक आहे. परंतु, पावसाच्या खंडामुळे पिकांचे व्यवस्थापन योग्य रितीने करणे आवश्यक आहे. काही ठिकाणी उशिरा पेरणी झाली आहे, तेथे पिकांसाठी पावसाचा खंड काळात योग्य उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. पाणी व्यवस्थापन
तण व्यवस्थापन
ः डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२ , ः अभिजित कदम, ८२७५०५१५०७ (वसंतराव नाईक मराडवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.