मुंबई शहरातील स्वतःचा व्यवसाय सांभाळत अमोल चव्हाण यांनी नारायणवाडी (जि. सातारा) येथे मित्राच्या सहकार्याने शेळीपालनास सुरवात केली. स्वतः शेळीपालन आणि बाजारपेठेचा अभ्यास करत व्यवस्थापनात बदलही केले. येत्या काळात शेळीपालनाच्या बरोबरीने शेतीमध्येही बदलाचे त्यांनी नियोजन केले आहे.
सातारा जिल्ह्यातील सवादे (ता. कराड) हे अमोल शामराव चव्हाण यांचे मूळ गाव. या ठिकाणी अमोल यांच्या वडिलांसह पाच भावाचे एकत्र कुटुंब. सध्या अमोल आणि त्यांचे काका हे मुंबई येथे स्थायिक झाले आहेत. त्यामुळे वडिलांकडे पाच एकर शेतीचे नियोजन आहे. साडेतीन एकरात ऊस तर उर्वरित दीड एकरामध्ये हंगामी पिकाचे नियोजन केले जाते. अमोल यांना लहानपणापासून शेती आवड, परंतु शेती कमी असल्याने त्यांनी बी.कॉम शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबई येथे दवाखान्यांना औषधे पुरवठा हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला. व्यवसायाच्या बरोबरीने घरच्या शेतीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. गावाकडील शेतीमध्ये नवीन काही करता येईल का? याचा शोध त्यांनी सुरू केला. लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पीक लागवडीएेवजी शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पूरक व्यवसायाची माहिती घेतल्यानंतर शेळीपालन हा व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येईल याचा अंदाज आला. त्यादृष्टीने त्यांनी राज्यभरातील ३५ शेळीपालकांना भेट देऊन व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र समजावून घेतले.
शेळीपालनास प्रारंभ
सवादे हे महामार्गापासून वीस किलोमीटर आतमध्ये असल्याने शेळी व्यवस्थापन आणि विक्रीसाठी अडचण येण्याची शक्यता वाटल्याने अमोल चव्हाण यांनी महामार्गालगतच्या गावात शेळ्यांसाठी शेड बांधण्याचा निर्णय घेतला. नव्या जागेचा शोध घेत असताना कराडपासून सात किलोमीटर अंतरावर महामार्गावरील नारायणवाडी (जि. सातारा) येथे ओळखीतून जमीन मिळाली. जमीन खरेदीमध्ये मोठी गुंतवणूक करण्यापेक्षा त्यांनी सात वर्ष कराराने ६८ गुंठे जमीन वार्षिक सव्वा लाख रुपये दराने भाडेतत्त्वावर घेतली. सन २०१५ मध्ये शेळीपालनासाठी शेड उभारण्यास सुरवात केली. अमोल चव्हाण यांनी या प्रकल्पात आर्थिक गुंतवणूक केली. परंतु मुंबईत राहून प्रकल्पावर दैनंदिन लक्ष ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी मित्र अमोल पाटील यांना मदतीला घेतल्याने दैनंदिन नियोजन सोपे झाले.
असे आहे नियोजन
शेळीपालन प्रकल्पाच्या नियोजनाबाबत अमोल चव्हाण म्हणाले की, मी व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये असतो. परंतु दर पंधरा दिवसांनी मुंबईहून दोन दिवस नारायणवाडी येथे येतो. बाकीच्या दिवसात शेळी आणि चार मजुरांचे व्यवस्थापन माझे मित्र अमोल पाटील पाहतात. दररोज मित्र आणि पशुतज्ज्ञांच्या बरोबरीने आवश्यक माहिती घेऊन नियोजन केले जाते. संगणकावरील नोंदीमुळे कमी वेळात शेडमधील शेळ्यांची सर्व माहिती दररोज मिळते. शेळीपालनाच्या बरोबरीने घरच्या शेतीमध्येही सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला आहे.
स्वतः केली बोकडांची विक्री प्रकल्प उभारणीबाबत अमोल चव्हाण म्हणाले की, बकरी ईद सणाची मागणी लक्षात घेऊन शेळीपालनास सुरवात केली. यंदाच्या बकरी ईदसाठी मी स्वतः आणि चार मजूर मिळून मुंबईतील देवनार मार्केटमध्ये ७० बोकड विकले. सरासरी ४०० ते ४५० रुपये प्रतिकिलो या दराने बोकडांची विक्री झाली. थेट ग्राहकांना विक्री केल्याने चांगला नफा मिळाला. दैनंदिन खर्च वजा जाता दर महिना पंचेचाळीस हजाराचा नफा मला मिळतो. मित्रालाही नफ्यातील काही वाटा मी देतो. दरवर्षी लेंडीखताच्या विक्रीतून एक लाख रुपये मिळतात. येत्या काळात गांडूळ खत व व्हर्मिवॉश प्रकल्प उभारणार आहे. सध्या माझ्याकडे १२० शेळ्या आहेत. जागेवरूनसुद्धा परिसरातील व्यापारी, शेतकऱ्यांना शेळ्या, बोकडांची विक्री केली जाते. महामार्गाजवळ प्रकल्प असल्याने दररोज लोकांची गर्दी होते. त्यामुळे शेळ्या आणि मजुरांच्या दैनंदिन कामात अडथळे येऊ लागले. आगंतूक भेटणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मी प्रकल्प पहाण्यासाठी ५० रुपये फी ठेवली. शेडमध्ये चार सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यामुळे दैनंदिन लक्ष राहाते. व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.