खरिपात भात व पुढे डिसेंबरच्या सुमारास भुईमूग अशा पीक पद्धतीचा अवलंब पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. कोसबाड हिल, डहाणू येथील कृषी विज्ञान केंद्राने आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी भुईमुगाच्या यशस्वी शेतीसाठी पॉली मल्चिंग व इक्रिसॅट तंत्रज्ञान रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीतही तंत्रज्ञान आत्मसात करण्याची आस या गुणांद्वारे भोयेपाडा मोर्हडा (जि. पालघर) या दुर्गम भागातील पांडुरंग देवराम चौधरी यांनी उन्हाळी भुईमूग लागवड यशस्वी करून त्यास मार्केटही मिळवले आहे. पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. सरासरी २५०० मिमी पाऊस पडतो. शेती प्रामुख्याने खरिपातच केली जाते. जिल्ह्यातील दुर्गम आणि पूर्णतः आदिवासी लोकवस्तीच्या मोखाडा तालुक्यातील भोयेपाडा मोर्हडा गावदेखील दुर्गम आणि जंगलाने वेढलेले आहे. पालघरपासून सुमारे ११० किलोमीटरवर वसलेल्या या गावात प्रगतिशील शेती करणे आव्हानात्मक असते. खरिपात पावसाच्या पाण्यावर भात, नागली, वरई, उडीद ही पिके घेतली जातात. खरीप संपल्यानंतर रोजगारासाठी गावातील बहुसंख्य तरुण मुंबई, नाशिक येथे स्थलांतर करतात. चौधरी यांची शेती गावातील पांडुरंग चौधरी यांना आर्थिक गरीब परिस्थितीमुळे पाचवीच्या पुढे शिक्षण घेता आले नाही. लहान वयात शेतीची जबाबदारी आली. आज त्यांचे वय ३३ वर्षे आहे. आई श्रीमती रखमा, पत्नी सौ. विमल तर गौरव, भारत व गायत्री ही मुले असा त्यांचा परिवार आहे. त्यांची सहा एकर शेती असून त्यात ते खरिपात भात, नागली, खुरासणी ही पिके घेतात. गावाजवळ धरण आहे. खरिपानंतर १०-१५ गुंठ्यात धरणाच्या पाण्यावर ते मिरची घेतात. उर्वरित क्षेत्र ओसाड असते. मिरचीचे अर्थकारण फारसे समाधानकारक नव्हते. केव्हीकेने दाखविला मार्ग सन २०१४ मध्ये कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), कोसबाड हिल, डहाणू, जि. पालघर यांनी भोयेपाडा तुळ्याचा पाडा (मोर्हंडा) गावाचे सर्वेक्षण करीत प्रमुख समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी भात, नागली, खुरासणी, परसबाग, कोंबडीपालन आदी प्रात्यक्षिके राबवण्याचे ठरवले. भांडवलाची कमतरता, बाजारपेठेचा अभाव, लागवड पद्धतीच्या माहितीचा अभाव या बाबी समोर होत्या. मात्र येथील शेतकऱ्यांत प्रगतिशील शेती करण्याची जिद्द व क्षमता पाहाता या समस्यांवर मात करणे शक्य होते. हीच बाब जाणून केव्हीकेचे तज्ज्ञ भारत कुशारे यांनी खरीप भातानंतर भुईमुगाचे पर्यायी पीक घेण्याचा मार्ग या शेतकऱ्यांना दाखविला. त्यानुसार पांडुरंग यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना एकत्र केले. कुशारे यांनी तंत्रज्ञान प्रशिक्षण देण्यास सुरवात केली. लागवड तंत्रज्ञान नियोजन
पांडुरंग यांची शेतीची वैशिष्ट्ये
भात –भुईमूग पीक पद्धतीचे चौधरींना झालेले फायदे
असे आहे इक्रिसॅट तंत्र
या तंत्राचे फायदे
बीजप्रक्रिया
उत्पादन (क्विंटल प्रति एकर)
वर्ष | तंत्रवापर | वाण | ओले उत्पादन | सुके उत्पादन | पाला उत्पादन |
२०१६ | पॉली मल्चिंग | टी.ए.जी.२४ | २७ | १७ | २८ |
२०१७ | इक्रिसॅट | टी.जी.३८ | १८ | ११ | २० |
२०१८ | इक्रिसॅट | टी.जी ३९ | २३.५ | १५ | २५ |
२०१९ | इक्रिसॅट | टी.जी ३९ | २२ | १४.३ | २३ |
उत्पादन खर्च- एकरी- २५ हजार रुपयांपर्यंत सरासरी दर (प्रति किलो) ४० रुपये- वाळलेल्या शेंगा ३० रुपये ओल्या शेंगा. विक्री व्यवस्था
समस्या पॉली मल्चिंग पेपरची जास्त किंमत तसेच आदिवासी भागात तो उपलब्ध होणे कठीण झाले. पीक काढणीनंतर प्लास्टिक शिल्लक राहत असल्याने जनावरांना चारा म्हणून उपयोग करण्यात अडचण येते.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल, डहाणू, जि. पालघर केव्हीके येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.) संपर्क- ९८५०२६०३५५
उन्हाळी भुईमुगाने पैसे चांगले दिलेच, पण रोजगारासाठीचे स्थलांतर थांबले. इक्रिसॅट तंत्र व सूक्ष्म सिंचनाचा वापर केल्यास उत्पादनात दीडपट ते दुपटीने फरक पडला. पूर्वी कुडाच्या घरात राहायचो. सुधारीत शेतीतून पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे. - पांडुरंग चौधरी ९७६६४८१६४५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.