जिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा कारखाना असेल; तर नफ्याचे गणित मांडणे सोपे जाते. त्याच धर्तीवर रत्नागिरी येथील हृषीकेश परांजपे यांनी काजू बी प्रक्रिया उद्योग यशस्वी केला. सातासमुद्रापार भरारी मारत अमेरिकेत काजूगराची निर्यात साधली. याच उद्योगातून त्यांनी उत्पन्नाची आणखी एक संधी शोधून काजूच्या टरफलापासून तेलनिर्मिती केली आहे. रासायनिक उद्योगांना या तेलाची विक्री केली जात असून, त्यातून उपपदार्थ म्हणून मिळणाऱ्या केकलाही (पेंड) बॉयलर उद्योगाची बाजारपेठ मिळवून दिली आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारे ‘ऑईल’ बनविणाऱ्या उद्योगांची संख्या कमी आहे. त्यात परांजपे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.
रत्नागिरी जिल्ह्यात आडीवरे हे कृषी प्रक्रिया उद्योजक हृषीकेश परांजपे यांचे गाव. मुंबई-कल्याण येथे शिक्षण झालेल्या हृषीकेश यांनी सॉफ्टवेअर क्षेत्रातील एका कंपनीत ‘फायनान्स’ विभागात नोकरी केली. नोकरीदरम्यान कॅनडाचा दौरा करण्याची संधी त्यांना मिळाली. तेथे काजू उद्योग व त्यातील विविध संधी त्यांनी पाहिल्या. काजू हे कोकणाचे मुख्य पीक असल्याने त्यांना हा उद्योग अधिक जवळचा वाटला. याच विषयात काहीतरी भरीव करायचे, असे त्यांच्या मनाने ठरवले. मग २००९ मध्ये नोकरीचा राजीनामा देत त्यांनी आपले गाव आडीवरे गाठले. पत्नी सौ. समृद्धी यांना सोबत घेत ‘परांजपे अॅग्रो प्रॉडक्ट’ या कंपनीची स्थापना केली. या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान घेत, अधिक अभ्यास करीत प्रक्रिया निर्मितीसोबतच बाजारपेठेचाही सविस्तर अभ्यास केला. काजू प्रक्रिया उद्योगातून देशाची बाजारपेठ मिळवण्याबरोबरच अमेरिकेत काजू निर्यात करण्यापर्यंत मजल मारली. काजू टरफलापासून तेलनिर्मिती संधी कुशल उद्योजक तोच असतो जो एकाच उद्योगातून उत्पन्नाच्या विविध संधी शोधतो. परांजपे यांनी हेच केले. प्रतिदिन तीन टन काजू बीवर प्रक्रिया सुरू होती. त्याच वेळी काजूगर तयार होताना टरफले वाया जात होती. त्यांच्यापासून काही करता येईल का, असा विचार सुरू झाला. टरफलापासून तेल काढता येते, ही माहिती केलेल्या अभ्यासातून झाली होती. या तेलाला इंग्रजीत कॅश्यूनट शेल लिक्विड अर्थात सीएनएसएल असे संबोधले जाते. या तेलाचे औद्योगिक महत्त्व, बाजारपेठ व अर्थकारण यांचा अभ्यास केला. काजू बी प्रक्रियेनंतर उर्वरित मालाचा वापर करून त्यातून उत्पन्न मिळाले, तर त्याचा मूळ उद्योगाला नफा होतो, हे देखील त्यातून उमगले. त्यातून हा प्रकल्पही उभारण्याचे निश्चित केले. प्रकल्प उभारणी व वाटचाल
तेल काढण्याची प्रक्रिया
तेलाचे होते वर्गीकरण साधारण एक हजार किलो टरफलांवर प्रक्रिया केल्यानंतर २०० किलो तेल, तर ७०० किलोपर्यंत केक (पेंड) मिळते. हे तेल साधारण कच्च्या स्वरूपाचे (क्रूड) असते. पुढे त्याचे तीन प्रकारांत वर्गीकरण होते. कार्डोनॉल, कार्डोल, फ्रिक्शन डस्ट, असे हे प्रकार असतात. तेलाचा वापर कुठे होतो? परांजपे म्हणाले की, या तेलाचा वापर इपॉक्सी पेंट म्हणून केला जातो. लोखंड गंजू नये, यासाठी या पेंटचा वापर केला जातो. मरीन प्लाय उद्योगातही त्याचा वापर होतो. तर, फ्रिक्शन डस्टचा वापर वाहन उद्योगात ब्रेक लायनिंग कोटिंगसाठी होतो. काजूच्या तेलाचा उपयोग पूर्वी घरांसाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडांनाही व्हायचा. त्यातून लाकडाचे आयुष्य वाढायचे. त्याला कीड सहजा लागायची नाही. तेल व केकची बाजारपेठ
प्रतिक्रिया काजू बी प्रक्रिया उद्योगातूनच टरफलापासून तेलनिर्मितीची संधी शोधली. सुमारे चार ते पाच वर्षांपासून हा उद्योग सुरू आहे. देशभरातील काजू उत्पादक तसेच प्रक्रिया उद्योजकांना सरकारने विविध रूपाने पाठबळ देण्याची गरज आहे. तरच, असे उद्योग पूर्ण क्षमतेने व स्थिरतेने सुरू राहतील. - हृषीकेश परांजपे परांजपे यांचा काजू टरफल तेल उद्योग दृष्टिक्षेपात
ः हृषीकेश परांजपे, ९१३००३६२०१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.