सातारा जिल्ह्यातील साप (ता. कोरेगाव) येथील जालिंदर शंकर कदम यांची शेती आहे. सुरवातीला कोरडवाहू असलेल्या या शेतीमध्ये आपल्या जालिंदर व भगवान या मुलांसोबत शेती करत. १९८७ साली धोम धरणाचा कालवा गेल्यामुळे गावात पाण्याची उपलब्धता झाली. आवर्तनासोबत विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यामुळे गावात बागायत क्षेत्रामध्ये वाढ झाली. जालिंदर व भगवान यांनीही धडाडीने आपल्या २५ एकर शेतीचे सपाटीकरण केले. लहान-मोठे प्लॅाट तयार केले. वडिलांच्या मनामध्ये कर्ज काढण्याविषयी भीती असल्याने त्यांचा मान राखत कोणतेही कर्ज न काढता केवळ शेतीच्या उत्पन्नातून हळूहळू शेती बागायत करत नेली. २००७ मध्ये सर्व शेती सिंचनाखाली आणली. २००५ मध्ये जालिंदर यांचे चिरंजीव उदय, सूरज आणि भगवान यांचे चिंरजीव अनिष हेही शेतीमध्ये उतरले. या मुलांनीही आपल्या आजोबांची शिकवण लक्षात ठेवत, कोणत्याही कर्जाशिवाय शेतीसाठी आधुनिक औजारे, ट्रॅक्टर व जीप, बंगला उभा केला. हळद पिकांचा आधार आजोबा जालिंदर कदम यांनी १९९२ मध्ये प्रथम हळद पीक घेतले. हे पिक फायदेशीर वाटल्याने आजतागायत हे पीक त्यांच्या शेतात कायम झाले आहे. आता पिढीनूसार लागवडीच्या तंत्रात अनेक बदल झाले असून, पूर्वीच्या तुलनेमध्ये उत्पादनातही वाढ झाली असल्याचे उदय सांगतात. सुरवातीच्या काळात हे पीक वाकुरी पद्धतीने केले जाई. त्यानंतर ते सरीवर केले जाई. आता गादीवाफ्यावर लागवड होते. वाकुरी व सरीवर सुमारे २० ते २२ क्विंटल प्रति एकर उत्पादन मिळत असे. मात्र, गादीवाफ्यावरील लागवडीमध्ये एकरी ३८ ते ४० क्विंटल हळदीचे उत्पादन मिळत आहे. २० वर्षांपेक्षा अधिक काळ हळद पिकांने साथ दिली आहे. उसापेक्षाही अधिक फायदेशीर असल्याने हे पीक कुटुंबाचा आर्थिक आधार झाले आहे. हळदीचे नियोजन
अर्थशास्त्र
कामाची विभागणी ः उदय हे पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि मजूराची हाताळणी याकडे लक्ष देतात. तर सुरज यांच्याकडे सर्व ट्रॅक्टर, बैल जोडीची जबाबदारी आहे. सर्वात लहान अनिष यांच्याकडे जनावरे, गोठा व्यवस्थापन व दुग्ध व्यवसाय यांची जबाबदारी आहे. अर्थात, आवश्यकतेनुसार एकमेकांला मदत केली जाते. आजही घरातील वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले जाते. आजोबा आणि वडिलांप्रमाणे मुलांनीही कर्ज न घेता विकास करण्याची पद्धत कायम ठेवली आहे. शेतीमध्ये कृषी सहायक अर्जुन भोसले, अनिल ढोले यांचे मार्गदर्शन मिळत असल्याचे उदय कदम सांगतात. २५ एकर शेतीचे नियोजन
दूध व्यवसाय गोठ्यामध्ये चार म्हशी, सहा गायी व दोन बैल आहेत. म्हशीचे साधारण १६ लिटर, तर गायीचे २८ ते ३० लिटर दूध निघते. त्याला फॅटनुसार प्रतिलिटर अनुक्रमे ३५ ते ४० रुपये आणि २५ रुपये दर मिळतो. जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन घरच्या शेतीमध्ये प्राधान्याने केले जाते. उदय कदम, ९५६१६१४२६०
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.