ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार सुभाष शर्मा, यवतमाळ नैसर्गिक, एकात्मिक फायदेशीर शेतीचं शर्मा मॉडेल आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या यवतमाळची ओळख पुसून टाकण्याचे प्रयत्न जिल्ह्यातील काही शेतकरी करीत आहेत. यवतमाळचे सुभाष शर्मा त्यापैकीच एक. नैसर्गिक स्रोतांचे संवर्धन, जमिनीची सुपीकता बळकट करणे, शंभर टक्के नैसर्गिक पद्धतीचा अंगीकार, बहुवीध पीक पद्धती, दर्जेदार उत्पादन, देशी गोसंगोपन, अशा विविध वैशिष्ट्यांनी शाश्वत शेतीचे मॉडेलच शर्मा यांनी उभे केले आहे. शेतीतलं गुरूकुल बागायती शेतकऱ्याबरोबरच कोरडवाहू शेतकऱ्याचे जीवनही समृद्ध झाले पाहिजे हाच ध्यास यवतमाळ येथील सुभाष शर्मा यांनी बाळगला आहे. यवतमाळ शहरापासून सुमारे २० किलोमीटरवरील तिवसा येथे त्यांची १० एकर शेती आहे. त्याच ठिकाणी सात एकर शेती भाडेतत्त्वावर घेतली आहे. हे १७ एकर क्षेत्र म्हणजे शेतीचे मोठे गुरूकुलच आहे. फळाफुलांनी समृद्ध शिवार रासायनिक खते, कीडनाशके न फवारता अडीच एकरांवर फुलवलेला टवटवीत हरभरा आणि झाडाला ४०० ते ५०० घाटे पाहून आपले मन प्रसन्न झाल्याशिवाय राहात नाही. ड्रीप किंवा स्प्रिंकलर न वापरता कंटूर पद्धतीचा हा हरभरा एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पादन देऊन जातो. पलीकडे तारा, मंडप, बांबू यांच्याविना फळांनी भरगच्च लगडलेला देशी टोमॅटो, शेजारी सुरती धण्याचा अर्थात कोथिंबिरीचा हिरवागार मधमाश्यांनी भरलेला बिजोत्पादन प्लॉट, पुढं देशी जांभळी वांगी, कांदापात, वालाच्या १० फूट उंचीपर्यंत लगडलेल्या शेंगा असं सगळं समृद्ध शिवार पाहिलं की शर्मा यांनी घडवलेल्या किमयेचा प्रत्यय येतो. सुभाष शर्मा यांची नैसर्गिक, एकात्मिक फायदेशीर शेती, पहा व्हिडिओ... शंभर एकरांतील प्रयोगशाळा यवतमाळपासून सुमारे चार किलोमीटवर मित्राची शंभर एकर शेतीदेखील शर्मा यांनी कसण्यास घेतली आहे. इथल्या ५७ एकरांत संशोधन, प्रयोग सुरू आहेत. इथं जमिनीची सुपीकता बळकट केली जातीय. कोणत्याही फवारण्यांशिवाय पीक अवशेषांचा भरपूर वापर करून तुरीचं एकरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन घेतलं जात आहे. कमी पाण्यात येणाऱ्या व जमिनीची सुपीकता टिकवणाऱ्या ऊसशेतीच्या मॉडेलवरही याच क्षेत्रात चाचण्या सुरू आहेत. त्याचबरोबर नैसर्गिक जीवनाची पुरेपूर अनुभती देणारं कृषी पर्यटन विकसित केलं जात आहे. शर्मा यांची मुख्य पिके तूर, हरभरा, सोयाबीन, भाजीपाल्यात कांदा पात, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, धने बियाणे, मेथी, कोहळा, आंबा, पेरू, चारा पिके. प्रातिनिधिक उत्पादन तूर, हरभरा- एकरी १० ते १५ क्विंटल. भाजीपाला पिके- एकरी ६० क्विंटल ते २५०, ३०० क्विंटलपर्यंत. पीक व वाणनिहाय त्यात बदल. शेतीची वैशिष्ट्ये
शेती तंत्रज्ञानाचा प्रसार
पुरस्कार शर्मा यांना कृषिभूषण, शेतीनिष्ठ तसेच यंदाच्या मराठी साहित्य संमेलनातही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.