उष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी होते, बाष्पीभवनाचा वेग वाढतो. याचा विपरित परिणाम झाडांच्या वाढीवर व घड पोसण्यावर होतो. वेगवान वाऱ्यामुळे झाडांची पाने फाटतात. परिणामी प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते. सध्याच्या काळात पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रामध्ये केळी पिकाची जून महिना (मृगबाग) आणि ऑक्टोबर महिन्यात (कांदे बाग) लागवड केली जाते. उन्हाळ्यात मृगबाग ही घड निसवणीची अवस्था पूर्ण करून घड पक्वतेच्या आणि कांदे बाग मुख्य शाखीय वाढीच्या अवस्थेत असते. उन्हाळ्यातील सरासरी तापमानात होणारी वाढ, वादळी वारे व गारपीट यामुळे केळी बागांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे उन्हाळ्यात केळी बागांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
उन्हाळ्यात होणारा परिणाम ः - उन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी वारे तसेच गारपीट या घटकांचा केळीवर परिणाम होतो. अधिक तापमानाचा वातावरणातील सापेक्ष आर्द्रता व जमिनीतील उपलब्ध पाण्याच्या साठ्यावर परिणाम होऊन त्याचा बागांवर अप्रत्यक्षरीत्या परिणाम होतो. अधिक तापमान व तीव्र सूर्यप्रकाशाचा होणारा परिणाम ः
उष्णलाटा, वेगवान वाऱ्याचा बागेवर होणारा परिणाम ः
संपर्क ः ०२५७-२२५०९८६ (केळी संशोधन केंद्र, जळगाव)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.