प्रतिकूल हवामानावर मात करणारे सीआरए (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर) हे तंत्रज्ञान अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर तमिळनाडू राज्यात चांगले रुजले आहे. फळबाग लागवडीसह वृक्षलागवड, औषधी वनस्पती, भाजीपाला लागवड आदींसाठी या राज्यात या तंत्राचा अवलंब मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. त्यातून अवर्षणातही तग धरून राहण्याची झाडांची क्षमता वाढली असून, त्यांची वाढही चांगली झाल्याचे आढळले आहे. हवामानाशी सुसंगत पीक पद्धती किंवा प्रतिकूल हवामानावर मात करण्याचे तंत्रज्ञान अनेक वर्षांचे प्रयत्न व प्रयोगांनंतर तमिळनाडू राज्यात विकसित झाले आहे. सीआरए (क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर ) म्हणजेच हवामान अनुकूल शेती पद्धती असे त्याला म्हटले जाते. फळबाग लागवडीसह रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड, नरेगा, औषधी वनस्पती, वनवृक्ष, वेलवर्गीय भाजीपाला लागवड आदींसाठी तमिळनाडू राज्यात या तंत्राचा अवलंब मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तमिळनाडू राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ. कोरलापल्ली सत्यगोपाल यांनी हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी व पुढे आणण्यासाठी अत्यंत कष्ट घेतले. ते चेन्नई येथे महसूल प्रशासनाचे अतिरिक्त प्रधान सचिव आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये ते निवृत्त होत आहेत. सुरवातीचे प्रयोग सन १९९१ च्या सुमारास उपजिल्हाधिकारी म्हणून होसूर जिल्ह्यात कार्यरत असताना अवर्षण स्थितीत फळबागा जगवण्यासाठी शेतकरी मडका सिंचनाचा वापर करत असल्याचे डॉ. सत्यगोपाल यांच्या दृष्टीस पडले. परंतु मडक्याच्या आकारामुळे पाणी हवे तितके खोलवर मुरत नसल्याचे दिसून आले. यानंतर वेगवेगळ्या आकाराची मडकी वापरून प्रयोग केले. दोन फूट खोल जाईल अशा लंबगोल मडक्याची निर्मिती त्यांनी स्थानिक कुंभाराकडून करून घेतली. शासकीय फार्मवर सुमारे नऊ हजार बांबू रोपांसाठी त्याचा प्रयोग करून तो यशस्वी झाला. परंतु त्यासाठी खर्च जास्त येत होता. त्यानंतर पीव्हीसी पाइपचा वापर करून प्रयोग करण्यात आले. परंतु तेही खर्चिक असल्याचे दिसले. पुढे २०१६ मध्ये मात्र ‘सीआरए’ तंत्रज्ञानाचा प्रसार सुरू झाला. डॉ. सत्यगोपाल पूर्वी ‘कमिशनर ऑफ रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन’ या पदावर काम करत असल्याने या पदाचेही संक्षिप्त सीआरए असेच होते. हेच नाव पुढे तंत्राला रूढ झाले. असे आहे तंत्रज्ञान
ठिबकला जोड ‘सीआरए’ची तमिळनाडूमध्ये ज्या ठिकाणी ठिबक बसवले आहे तेथे ड्रीपर हे वाळूच्या ‘कॉलम’वर येईल याची दक्षता घेतली जाते. ठिबक सुरू केले की पाणी वाळूच्या ‘कॉलम’द्वारे झिरपून दोन फुटांचा मातीचा थर अल्पावधीत सिंचित होतो. या तंत्रामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. प्रयोगांचे उत्साहवर्धक परिणाम
जुन्या बागांमध्ये प्रयोग अवर्षणाच्या काळात अनेक फळबागा वाळून जातात. तीरुप्पूर जिल्ह्यातील नारळाची अशी बाग या तंत्राने वाचवण्यात यश आले आहे. बुंध्यापासून थोडे दूर छिद्र पाडून त्यात गांडूळ खत व बारीक वाळू भरून त्याद्वारे सिंचन दिले जाते. यामुळे कमी पाण्यातही फळबाग तग धरू शकते.
(लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.) संपर्क- डॉ. टी. एस. मोटे-9422751600
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.