पाच भावांच्या एकीतून पुढारलेली व्यावसायिक शेती

भरताची दर्जेदार वांगी दाखवताना पद्मसिंग दुलत
भरताची दर्जेदार वांगी दाखवताना पद्मसिंग दुलत

ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत कुटुंबातील पाच भावांची एकत्रित शेती समस्त शेतकऱ्यांसाठी आदर्श आहे. आपल्या ३६ एकरांत वर्षभर विविध भाजीपाला पिके, हंगामनिहाय त्यांचे उत्कृष्ट नियोजन, सर्वांचे एकत्रित बळ, पाणी, मजूर व्यवस्थापन, भाडेतत्त्वावर शेती घेणे आदी विविध वैशिष्ट्यांमधून दुलत यांनी शेतीतून संपन्न समृद्धी निर्माण केली आहे. ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील शिवसिंग दुलत यांची भरतसिंग, धरमसिंग, पदमसिंग, प्रतापसिंग व रामधन ही पाच विवाहित मुले. शिक्षणाची इच्छा असूनही परिस्थिती जेमतेम असल्याने दहावी- बारावीपुढे कुणाला शिक्षण घेणे शक्‍य झाले नाही. पण कायम एकत्र राहून शेतीतच मोठं करिअर घडविण्याचा निर्णय सर्व बंधूंनी घेतला. २७ जणांचं एकत्रित कुटूंब वडील शिवसिंग व आई रूख्मनबाई यांनी पाचही भावांना किंवा संपूर्ण कुटूंबाला एकत्र बांधून ठेवलं आहे. सर्वजण एकाच घरात गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या समन्वयाने निर्णय घेतात. कुटूंबाची शेती

  • वडिलोपार्जित साडेसहा एकर शेती आहे. मोठ्या कष्टाने १९८० ते २०१० दरम्यान शेतीतील उत्पन्नातूनच थोडी-थोडी शेती खरेदी करत क्षेत्र ३६ एकरांवर पोचविले. 'एकीचे बळ' लक्षात आल्याने विस्तारलेल्या या शेतीला दहा वर्षांपासून २५ एकर ठोक्‍याच्या शेतीची जोड दिली आहे.
  • सुमारे १९९५ पर्यंत पारंपरिक पिके घेतली जायची. शेती अधिक उत्पन्नक्षम होण्यासाठी
  • पीकबदल करायचा निर्णय घेतला.
  • सध्याची पीकपद्धती मुख्य पीक आले

  • - सन २००० पासून एक एकरापासून सुरू केलेली लागवड आता ८ ते १० एकरांवर
  • एकरी १२० ते १५० क्‍विंटल उत्पादन
  • भाजीपाला केंद्रित शेती
  • टोमॅटो - जूनमध्ये आठ ते दहा एकर, ऑगस्ट - ७ ते ८ एकर व
  • फेब्रुवारीत ५ ते ६ एकर.
  • दरवर्षी तीन टप्प्यात असल्याने जवळपास वर्षभर उत्पादन
  • त्यातून दरांची जोखीम कमी होते.
  • त्याचे एकरी उत्पादन - १४०० ते १५०० क्रेट
  • भरताचे जांभळे वांगे
  • एप्रिल लागवड - सात ते आठ एकर - उत्पादन- ३० ते ३५ टन
  • सप्टेंबरमध्ये दुसरी लागवड - (८ ते १० एकर)- उत्पादन- ४० टनांपर्यंत
  • एप्रिलमध्ये किलोला १५ ते २० रुपये दर, सप्टेंबर हंगामात ते तुलनेने कमी. मात्र
  • उत्पादकता जास्त मिळत असल्याचा फायदा
  • शेवगा- - पहिल्यांदाच दहा एकरांवर केलेले शेवग्याचे पीक वांग्यानंतर दुसरे पसंतीचे पीक.
  • वीस एकरांपर्यंत विस्तार. एकरी दहा ते बारा टनांपर्यंत उत्पाद.
  • १० पासून ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतात.
  • डांगर
  • दोन एकरांपासून सुरू केलेले हे पीक ५ ते ७ एकरांपर्यंत
  • एकरी १५ ते २० टन उत्पादन. ५ ते १० रुपये प्रति किलोपर्यंत दर
  • टोमॅटो काढणीपूर्वी दोडका व कारले
  • उन्हाळी टोमॅटोच्या काढणीआधी एक महिना त्याच शेतात चार एकरांत दोडका तर दोन एकरांत कारले
  • दोडक्‍याचे एकरी ४०० क्रेट (१५ किलोचा क्रेट) तर २० ते५० रुपये प्रति किलो दर
  • कारल्याचे एकरी ४०० ते ५०० क्रेट उत्पादन. २५ ते ३० रुपये दर
  • मिरची
  • एप्रिलमध्ये पाच ते सात एकर. एकरी ८ ते १० टन उत्पादन.
  • कलिंगड, कांदा
  • सन २०१८ प्रथम पाच एकरांत कलिंगड. त्यातून एकरी दहा टन उत्पादन
  • सन २००३ पासून कांदा घेण्यास सुरुवात. दरांत चढउतार होत असले तरी साठवणुकीसाठी २०१६ १०० टन क्षमतेची कांदाचाळ तयार केली. 
  • सिंचनाच्या सुविधा
  • संपूर्ण शेती सिंचनाखाली आणण्यासाठी वडिलोपार्जीत शेतीतील दोन विहिरींना २०१५ नंतर तीन विहिरींची जोड दिली. सन २०१२ च्या दुष्काळात तीन बोअरवेल्स, एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. तीव्र उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या काळात त्याचा वापर होतो. एका विहिरीतील पाणी दुसऱ्या विहिरीत वा शेततळ्यात नेता येईल तसेच शेततळ्यातील पाणी विहिरीत गरजेनुसार नेता येईल, अशी पाइपलाइनची व्यवस्था केली. करारशेतीतही पाण्याची व्यवस्था असेल अशाच क्षेत्रावर भर दिला. पाण्याचे महत्त्व ओळखून संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली आणले. बाजारपेठ व्यवस्था स्थानिकसह सुरतसह मुंबईच्या वाशी मार्केटला भाजीपाला जातो. सुमारे २५ वर्षांपासून टोमॅटो घेणारे दुलत बंधू पूर्वी अन्य शेतकऱ्यांसोबत आपला माल भाड्याने केलेल्या वाहनातून पाठवायचे. आता त्यांनी स्वत:ची दोन वाहने घेतली आहेत. भरताच्या वांग्यांची लागवड केल्यापासून अलीकडील सहा वर्षांत वाशी मार्केटमधील व्यापाऱ्यांशी ‘लिंक’ जोडली गेली. ज्या शेतकऱ्याचे हे वांगे पाहून दुलत बंधू त्याकडे वळले त्यानेच त्यांना हे मार्केट व संबंधीत व्यापाऱ्याशी जोडणी करून दिली. आता बहूतांश माल वाशी मार्केटलाच जातो. दुलत यांच्या शेतीची अन्य वैशिष्ट्ये

  • दोन ट्रॅक्‍टर्स व त्यावर चालणारी यंत्रे
  • छोटा ट्रॅक्‍टरचलित ब्लोअर
  • प्रतवारी व बॉक्‍स पॅकिंगचा वापर
  • शिक्षण घेणारी घरची मुलेही वेळेनुसार करतात शेतीत काम
  • पहाटे साडेचार वाजता दिवस सुरू पद्मसिंग सांगतात की माझा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरू होतो. आम्ही पाचही बंधू संध्याकाळी आठ वाजेपर्यंत शेतीकामांमध्येच व्यस्त असतो. अन्य कोणत्याही रिकाम्या चर्चेत वा कामांत वेळ वाया घालवत नाही. आम्हाला कसलेही व्यसन नाही. केवळ काम हेच व्यसन आम्हाला लागले आहे. संपर्क : पद्मसिंग दुलत - ९४२२५४५८६३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com