गरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (ता. धामनगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील नामदेव वेद्य यांनी पेरणी ते काढणीपर्यंत शेतीचे यांत्रिकीकरण केले आहे. एकूण ८० एकर शेती सांभाळताना विविध यंत्रे वापरत श्रम, वेळ व पैसा यात त्यांनी बचत केली. शिवाय स्वतःच्या शेतीतील गरजेनुसार स्वंशोधन करीत काही यंत्रेही विकसीत केली. अमरावती जिल्ह्यातील निंभोरा बोडखा येथील नामदेव वैद्य यांची घरची ५० एकर शेती आहे. दोघे भाऊ, मुले व आईवडील असे हे कुटुंब आहे. आज एकत्रित कुटुंबपद्धतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परंतु वैद्य कुटुंब त्याला अपवाद ठरले आहे. नामदेव घरची शेती सांभाळतात तर वासुदेव मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी म्हणून धामनगाव येथे तालुक्याच्या ठिकाणी राहतात. परंतु कुटुंबाचे व्यवहार एकत्रित आहेत. नामदेव यांचे शेतीतील ‘करिअर’ नामदेव यांनी १९९० ते १९९२ या काळात ‘आयटीआय’ मधून पेंटिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरुवातीला ३० रुपये प्रती दिन पाठ्यवृत्तीवर प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून काम केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अवघ्या २०० रुपये रोजगारासाठी काही खासगी कंपन्यांत त्यांनी काम केले. मात्र घरची ५० एकर शेती सतत खुणावत होती. त्यामध्येच आपले कर्तृत्व सिद्ध करावे असा निश्चय करून नोकरीचा राजीनामा देत ते गावी परतले. शेतीचा विस्तार वैद्य कुटुंबाची सुरुवातीला अवघी चार एकर शेती होती. त्यानंतर १५ एकरांपर्यंत क्षेत्र वाढवले. टप्याटप्याने ते 50 एकरांवर दोन्ही भावांनी मिळून नेले. आज घरच्या ५० एकरांबरोबरच मित्राची ३० एकर शेती ते ३५ वर्षांपासून कसत आहेत. नामदेव यांनी गावातील काही शेतकऱ्यांच्या सहकार्याने कास्तकार सोया प्रोड्यूसर कंपनीची उभारणी केली आहे. सुनील बोरकर अध्यक्ष तर नामदेव उपाध्यक्ष आहेत. या माध्यमातून कडधान्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग उभारणीचे प्रस्तावित आहे. यांत्रिकीकरण नामदेव यांनी शेतीतील यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. त्यांच्याकडे ट्रॅक्टरचलित खत देणारे यंत्र आहे. सोयाबीन पेरणीच्या सुमारे २० दिवस आधी त्याचा वापर ते करतात. प्रति दिवसाला २५ एकरांपर्यंत खत देणे या माध्यमातून शक्य होते. पारंपरिक पद्धतीत जिथे १५ मजुरांची गरज भासली असती तिथे हे काम अवघ्या तीन मजुरांच्या बळावर शक्य होते. शिवाय जयपूर (राजस्थान) येथून त्यांनी कापूस टोकण यंत्र घेतले आहे. दोनशे ते अडीचशे रुपये प्रति महिला अशी मजूर कापूस टोकणीकामी घेण्यात येते. दहा एकरांसाठी यात १५ मजुरांची आवश्यकता भासते. त्याऐवजी या पद्धतीत कमी खर्चात दिवसभरात १० एकरांत कापूस पेरणी करता येते. यांत्रिकीकरणातील ठळक बाबी
वैद्य यांच्याकडील अन्य अवजारे नऊ दात्याचे कल्टिव्हेटर, ट्रॅक्टरचलीत वखरपास, पंजी, तीन पानांची ट्रॅक्टरचलीत तिरी (तूर शेंगा अवस्थेत आल्यावर यंत्राचा वापर होतो. ते जमिनीत खोल जाते. त्यामुळे माती वर येते. तणकटे काढता येतात.) ट्रॅक्टरचलीत यंत्रांचा वापर वाढल्यामुळे यातील काही अवजारांचा वापर आता होत नाही. यंत्राच्या वापराविषयी काही
संपर्क- नामदेव वैद्य-९८९७०२३१६१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.