विक्री तंत्रांमध्ये होतोय बदल

शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने उत्पादनासह विक्रीतही आघाडी घेतली आहे. प्रक्रिया उद्योगानाही चालना मिळाल्याने पूर्वीच्या तुलनेत शेती व्यवसाय फायद्यात येत असल्याचे चित्र आहे.
शेतकरी पॅकींगद्वारे तसेच थेट ग्राहक पध्दतीने मालाची विक्री करू लागले आहेत.
शेतकरी पॅकींगद्वारे तसेच थेट ग्राहक पध्दतीने मालाची विक्री करू लागले आहेत.

शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने उत्पादनासह विक्रीतही आघाडी घेतली आहे. प्रक्रिया उद्योगानाही चालना मिळाल्याने पूर्वीच्या तुलनेत शेती व्यवसाय फायद्यात येत असल्याचे चित्र आहे.   शेतीतील नव्या पिढीने पीक उत्पादनाबरोबरच विक्री व्यवस्थेचाही बारकाईने अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. त्यास कृषी विभाग, सहकारी व खाजगी क्षेत्रातील संस्थांनी मदत करत चालना देण्याचे काम केले. बाजाराची स्थिती व ग्राहकांची गरज ओळखून शेतमालाचे उत्पादन, सेंद्रिय शेतीला येत असलेले महत्त्व, प्रतवारी, पॅकिंग, शेतमाल प्रक्रिया याबाबत शेतकऱ्यांत जागृती झाली. युवा शेतकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद देत शेतात सुधारीत तंत्र वापरण्याबरोबर सोशल मिडीया व ऑनलाइन पद्धतीने विक्रीचे तंत्र आत्मसात केले. गटांचा पुढाकार राज्यात अनेक शेतकरी गट तयार झाले. त्यांचे समूहामध्ये रूपांतर होऊन हळूहळू शेतकरी कंपनी व त्यानंतर राज्यपातळीवर सर्व शेतकरी कंपन्यांची मिळून ‘महाएफपीसी’ ची स्थापना झाली. सध्या राज्यात एक लाखांहून अधिक शेतकरी गट तर ४०० ते ५०० शेतकरी कंपन्या आहेत. पुणे, मुंबई यासह अन्य शहरांतील गृहनिर्माण सोसायट्यांतील ग्राहकांना त्यांच्यामार्फत शेतमालाची विक्री केली जात आहे. शहरी ग्राहकांची गरज ओळखून शेतकऱ्यांनी प्रतवारी व पॅकिंगमध्ये आकर्षक बदल करण्यास सुरुवात केली. कोरूगेटेड बॉक्सचा अवलंब केला जाऊ लागला. शिरूर येथील केंद्राई माता शेतकरी कंपनी, पुरंदर येथील पुरंदर नॅचरल, जुन्नरमधील बळीराजा अशा विविध शेतकरी कंपन्यांनी पॅकिंग करण्यावर भर दिला आहे. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. शेतमालाला प्रति किलोमागे पाच ते दहा रुपयांचा अधिक दर त्यातून अधिक मिळू लागला आहे. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. प्रक्रियायुक्त मालाला मागणी उत्पादित मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने नुकसान टाळण्यासाठी प्रक्रिया करून शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याकडे शेतकरी वळले. त्यातून कुटुंबाची आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पुणे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर यासह मराठवाडा व विदर्भातील अनेक शेतकरी अंजीर, पेरू, सीताफळ, टोमॅटो, कांदा अशा मालांच्या प्रक्रियेकडे वळला आहे. न्हावरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील प्रयोगशील उद्योजक गीताराम कदम यांनी तर फळे व भाजीपाला निर्जलीकरण अर्थात ‘डीहायड्रेशन’ करून प्रक्रियायुक्त माल सहा ते एक वर्षांपर्यंत टिकवण्याचे तंत्र अवलंबिले आहे. लॉकडाऊनमध्ये थेट विक्रीचे महत्त्व वाढले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लाँकडाऊनमध्ये शेतमाल विक्रीचे आवाहन तयार झाले. अशावेळी शेतकरी गट, कंपन्यांनी पुढाकार घेतला. त्यातून शेतकरी व ग्राहक अशा दोघांचाही चांगला फायदा झाला. काही गटांनी आपली वेबसाईट सुरू करून ऑनलाइन मागणी नोंदवत विक्री सुरू केली. त्या माध्यमातून अनेक ग्राहक जोडले गेले आहेत. याशिवाय व्हॉटस ॲप , फेसबूक तसेच अन्य सोशल मिडीयाचा आधार घेतला. या काळात मळद (ता. बारामती) येथील प्रल्हाद वरे यांनी सोशल मिडीयाद्वारे जवळपास पाच ते सहा एकरांतील कलिंगड, खरबुजांची थेट विक्री केली आहे. सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेतल्याने शेतमाल विक्रीचे तंत्र बदलू लागले आहे. येत्या काळात थेट शेतमाल विक्रीच्या क्षेत्रात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com