शेतीला चोवीस तास वीज मिळावी, रात्रीचे भारनियमन कमी व्हावे हीच सध्या समस्त शेतकऱ्यांची इच्छा आहे. न्हावरे (जि. पुणे) येथील प्रगतिशील शेतकरी गीताराम कदम यांनी आपल्या स्तरावर ही इच्छा पूर्ण केली आहे. पवन व सौरऊर्जा यापासून त्यांनी आधुनिक तंत्राची ‘हायब्रीड’ पवनचक्की कमी खर्चात तयार केली आहे. पाच एकरांत त्याचा वापर सुरूही केला आहे. घरातील वीजही त्यांना याच तंत्रापासून मिळू लागली आहे. सध्या समस्त शेतकऱ्यांना भेडसवणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे वीजभारनियमन. रात्री आठ व दिवसा आठ दिवस वीज अशी स्थिती असल्यानंतर शेतकऱ्यांना शेतीचे नियोजन करणे कठीण झाले आहे. न्हावरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील प्रगतिशील शेतकरी व ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष गीताराम कदम यांनी या समस्येवर कायमस्वरूपी पर्याय शोधला आहे. पवनचक्की व सौर ऊर्जेचा बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्याचे त्यांनी ठरवले. याच तालुक्यातील पाबळ येथील विज्ञान आश्रमातील २२ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण देण्याची सोय केली. अमेरिकेतील मित्र जॉर्ज यांनाही तांत्रिक मदतीसाठी बोलावून घेतले. यात लाकूड व अन्य असे ९० टक्के जुने साहित्य वापरले. असा प्रकल्प म्हणजे जगातील ‘वॉटर पंपिंग’ साठी बनविलेला पवन व सौर ऊर्जा यांचे एकत्रीकरण केलेला पहिला प्रयोग होता. तांबे (कॉपर) व मॅग्नेट यांचा मुख्य वापर केला. पवनचक्की तयार करण्यासाठी २२ विद्यार्थी काही दिवस मेहनत उपसत होते. यंत्रणेच्या एक ते दोन प्राथमिक चाचण्याही घेण्यात आल्या. पवनचक्की व त्यातील तंत्रज्ञान
खर्च एक किलो वॅट क्षमतेच्या पवनचक्कीसाठी सव्वालाख रुपये, तीन किलो वॅट क्षमतेसाठी अडीच लाख रुपये तर हायब्रीड यंत्रणेसाठी (पवन व सौर) साडेतीन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. हा खर्च दोन ते तीन वर्षाच्या वीजबिलातून वसूल होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात अत्यंत माफक पैशांमध्ये वीज मिळू शकेल. प्रत्यक्ष वापर व फायदे
पवनचक्कीबाबत ठळक बाबी
जीपीएस यंत्रणेचा वापर पवनचक्कीच्या माध्यमातून रोज ताशी किती वीज तयार होते त्याची माहिती तत्काळ मोबाईलवर उपलब्ध होण्यासाठी टॉवरवर ‘जीपीएस’ यंत्रणा बसविली आहे. यावरून पवनचक्कीची क्षमता तसेच पवनचक्की सुरू की बंद आहे याची तत्काळ माहिती समजते. शासनाचे अनुदान हवे नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या विज्ञान आणि औद्योगीकी संशोधन विभागाकडे यंत्रणा चाचणीसाठी पाठवून त्यांची दोन वर्षांपूर्वी मान्यता घेतली आहे. भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडे शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. अद्याप त्यास मंजुरी मिळालेली नाही. या पवनचक्क्यांचा शेतकऱ्यांना अधिकाधिक फायदा होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने अनुदान देणे गरजेचे आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना विजेचा अखंडित वापर करणे शक्य होऊ शकेल. पर्यावरणही दूषित होणार नाही. घरामध्येही वीज राहील असे गीताराम कदम यांचे म्हणणे आहे. असे होतील पवनचक्कीचे फायदे
संपर्क- गीताराम कदम - ९९२२९४६५४०
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.