औरंगाबाद जिल्ह्यातील जरंडी गावातील शेतकऱ्यांनी हवामानबदल, पाणीटंचाईची बाब वेळीच ओळखून पीकपद्धती व एकूण व्यवस्थापनात बदल केला. मोसंबी, केळीसाठी पूर्वी प्रसिद्ध असलेल्या गावाने सीताफळ, पेरू या कमी पाणी लागणाऱ्या पिकांतून परिवर्तन साधले. मृगबहार, ठिबक, सूरत व स्थानिक बाजारपेठ, संघटन व उत्कृष्ट व्यवस्थापन यांच्या जोरावर या पिकांतून आर्थिक सक्षमता त्यांनी वाढवली आहे.
जरंडी हे गाव औरंगाबाद जिल्ह्यात येत असले तरी जळगाव जिल्ह्याच्या सीमेजवळ ते आहे. वाढते तापमान, अवकाळी पाऊस, गारपीट, पावसातील खंड, बेभरवशाचे मॉन्सूनचे आगमन आदी बाबी वारंवार घडत आहेत. यामुळे शेती बेभरवशाची, जोखमीची झाली आहे. जरंडी गावही त्यातूनच जाते आहे. अजंठा वेरूळ हा लेण्यांसाठी प्रसिद्ध भाग याच गावाजवळ आहे. येथील डोंगरावरून पडणारे पाणी हाच काय तो मुख्य जलस्राेत असल्याचे गावातील दिलीप पाटील बोलून दाखवतात. भूगर्भातील पाणीपातळीही दिवसेंदिवस घटत चालली आहे. पाण्याचा उपसा वाढला आहे. जरंडीकरांनी वेळीच जागे होत कमी पाण्यात येणाऱ्या पिकांकडे मोर्चा वळवला आहे. पेरू, सीताफळावर भर जरंडीकरांनी कमी पाण्यात येणाऱ्या पिकांचा अभ्यास करताना त्यांना चांगली बाजारपेठही आहे का याचा विचार केला. त्यातून पेरू, सीताफळ अशी पिकं प्रकर्षानं पुढे आली. पेरू, सीताफळ, कागदी लिंबू आदी पिकांखालील क्षेत्र आता गावात वाढत चालले आहे. सीताफळ सुमारे १२५ एकर, पेरू १०२ एकर व कागदी लिंबू सात एकर क्षेत्रावर आहे. एकूण १२२८ हेक्टर कापूस लागवडीपैकी सुमारे ८४३ हेक्टर कापूस ठिबक सिंचनाखाली आहे. जरंडीतील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणारे आहेत. डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात पूर्वी पाण्याची विपुलता होती. जिकडे पाहावे तिकडे केळी आणि मोसंबीच्या बागा दिसायच्या. जळगाव जिल्ह्याला लागूनच सोयगाव तालुका असल्याने केळीचे कल्चर चांगल्या प्रकारे विकसित झाले. आता मात्र पाण्याच्या टंचाईमुळे गावात केळीचे खोड पाहायला मिळत नाही. मोसंबीचे क्षेत्र केवळ ८२ एकरांपर्यंत उरले आहे. सीताफळ, पेरू या पिकांना अन्य फळपिकांच्या तुलनेत कमी पाणी लागते. एखाद्या वर्षी पाऊस खूप कमी झाला तर उत्पादन एकवेळ घेता येणार नाही, परंतु बाग मात्र वाचवता येते. कारण उन्हाळ्यात ही पिके वाळून जात नाहीत. उन्हाळ्यात पाणी कमी पडले तर वर्षानुवर्षे जोपासलेल्या मोसंबीचे जणू सरपण होते. केळीचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात घटून प्रत बिघडते. मोसंबीच्या तुलनेत कमी पाणी लागणाऱ्या कागदी लिंबाचीही लागवड वाढत आहे. सघन पद्धतीने पेरू लागवड
दिलीप पाटील यांची प्रयोगशीलता दिलीप पाटील यांची सुमारे साडेचार एकर सीताफळाची जुनी तर नवी तीन एकर बाग आहे. अडीच एकर पेरू आहे. मोसंबीचे सहा एकर तर डाळिंबाचे तीन एकर क्षेत्र होते. पाण्याअभावी दोन्ही फळांची शेती त्यांनी थांबवली आहे. पेरू, सीताफळाबाबत ते समाधानी आहेत. सीताफळ
पेरू
समाधानकारक दर व मार्केट
शेततळ्याची व्यवस्था पाटील यांचे कापूस हेदेखील महत्त्वाचे पीक. सुमारे एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे. सध्या त्यात पाण्याची चांगली अवस्था. किफायतशीर फळपिके पाटील सांगतात की मृगबहार घेतला की पुढे पाण्याची अडचण कमी राहते. या दोन्ही पिकांना मजूरबळ कमी लागते. पेरूचे कल्चर अलीकडील काळात विकसित झाले असले तरी सीताफळाची तीस वर्षांची बागदेखील पाहण्यास मिळते. अन्य शेतकऱ्यांचे अनुभव
अभ्यासपूर्ण शेतकरी
व्यापाऱ्यांना भावणारे फळ पेरूची झाडावर असलेली संख्या, झाडाचे वय यानुसार प्रत्येक बागेची किंमत वेगवेगळी मिळते. सरासरी एकरी एक लाख रुपयांना बाग जाते. सुनील पाटील यांची पेरूची बाग नेहमी अधिक किमतीला विकली जाते. संपर्क- रवींद्र पाटील – ९९७५०७३६८८ दिलीप पाटील – ८२७५३२५७२१ (लेखक औरंगाबाद येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.