यंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा तेल महत्त्वाचे असते अगदी तसेच स्नायूंच्या आणि पेशींच्या बळकटीसाठी स्निग्धपदार्थ महत्त्वाचे आहेत. स्निग्ध पदार्थांमध्ये आपण तेल, तूप, बटर, लोणी, चीज, सुका मेवा, मासे, अंडी, इ. पदार्थांचे सेवन करतो. बहुतांशी तेल हे सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, मोहरी या तेलबियांपासून काढले जाते. तीळ, शेंगदाणा या तेलबियांपासून चिक्की, चटणी हे आहारातले दैनंदिन पदार्थ झाले आहेत; पण या सर्वांत जवसाचे सेवन मात्र फारच कमी किंवा नाहीच असे आहे. जवस हे सुद्धा एक तेलबिया पीक असून, पोषणमूल्यांनीयुक्त आहे. जवसाचे सोनेरी आणि गडद तपकिरी असे दोन प्रकार अाहेत. बाह्यस्वरूपी दिसायला लांबुळके, एका टोकाला अंडाकृती आणि दुसऱ्या बाजूला टोकदार असते. दोन्ही प्रकारच्या जवसाच्या प्रकारामध्ये पोषक घटक सम प्रमाणात असतात. भारतात बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र ही प्रमुख जवस उत्पादन करणारी राज्ये आहेत. महाराष्ट्रात औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून जवस उत्पादन अधिक घेतले जाते. पूर्वीपासूनच जवसचा उपयोग हा लिनन तंतू किंवा कापड तयार करण्यासाठी केला जातो.
संपर्क ः एस. एन. चौधरी, ८८०६७६६७८३ (के. के. वाघ अन्न त्रज्ञान महाविद्यालय, नाशिक.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.