शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे यांनी सुमारे अडीच एकराचे प्लॉट निश्चित करून एकाचवेळी पाच ते नऊ पिके घेत तीनमजली शेतीचे तंत्र यशस्वी केले आहे. मुख्य पिकातील खर्च कमी करणे, शेतीतील जोखीम कमी करणे व बारमाही ताजे उत्पन्न मिळवीत राहणे असे अनेक फायदे त्यातून ते मिळवीत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात शिवणी आरमाळ (ता. देऊळगाव राजा) हे १८०० लोकसंख्येचे गाव आहे. तालुक्यापासून ४५ किलोमीटरवर असलेल्या या खेड्यात कैलास अर्जुनराव नागरे यांची शेती आहे. डीएड झाल्यानंतर त्यांना शिक्षकपदाची नोकरी मिळाली. मात्र आईला २००६ मध्ये दुर्धर आजाराचे निदान झाले. तिचे निधन झाले. मग कैलास यांना नोकरी सोडावी लागली. शेतीत पूर्णवेळ त्यांनी झोकून दिले. त्यातही कधी अतिपाऊस, कधी दुष्काळी स्थिती असे निसर्गाचे आघात सहन केले. तब्बल १६ लाख रुपये कर्जाचा डोंगर उभा राहिला. तरीही ज्ञान, अनुभव यांची सांगड घालत हिमतीने वाटचाल सुरू ठेवली. सुधारित, व्यावसायिक शेती पध्दतीचा अंगीकार करताना बहुस्तरीय किंवा मजले पध्दतीचे तंत्र आत्मसात केले. सन २०१३ मध्ये विहीर खोदली. एकाच ठिकाणी १३ व्हॉल्व्ह्ज बसवले. तेथून संपूर्ण शेतीत डबल तीन इंची पाइपलाइन केली. त्याद्वारे २०१३ मध्येच संपूर्ण १५ एकरांला फर्टिगेशन (ठिबकद्वारे पाणी व खते) सुरू केले. कैलास यांच्या खांद्याला खांदा लावून पत्नी गीतादेखील वखरणी, कोळपणी, निंदण, फवारणी, बेड तयार करणे अशी बहुतांश कामे उत्स्फूर्तपणे करतात. असे आहे तीन मजली शेतीचे तंत्र
तीन मजली पीक पद्धतीचे फायदे
‘तीन मजली’ चे प्रयोग सन २०१९-१०
सन २०२०-२१
सेंद्रिय शेतीवर भर नागरे बहुतांशी सेंद्रिय तर काही प्रमाणात रासायनिक पद्धतीचा वापर करतात. त्यांच्याकडे चार देशी गायी आहेत. जिवामृत व गोमूत्राचा शेतीत वापर होतो. गोमूत्र संकलनात मुले संचिता, सार्थक आणि स्वरा मदत करतात. शेतकरी, कवी, लेखक कैलास कविता करतात. लेख लिहितात. हार्मोनिअम वाजवतात. बहुविध पीक पद्धती, जैविक शेती, गोपालनाचा प्रचार करतात. तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. ते जय गोपाल सेंद्रिय शेती गटाचे अध्यक्ष व देऊळगावराजा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक आहेत. कैलास ‘ॲग्रोवन’चे नियमित वाचक आहेत. प्रयोगशील शेतीला ॲग्रोवनने दिशा दिल्याचे सांगतात. विविध कृषी प्रदर्शनांना ते भेटी देतात. शेतकऱ्यांकडील प्रयोगांना प्रत्यक्ष भेटी देतात. यापूर्वी साध्य केलेले उत्पादन (एकरी) भुईमूग - १६ ते १८ क्विं. मका - ४० क्विं. हरभरा - १२ ते १४ क्विं. तूर - १५ क्विं. गहू - २२ क्विं. खरबूज - १४ टन कलिंगड - २५ टन सोयाबीन - १५ क्विं. पपई - ३० ते ४० टन संपर्क- कैलास नागरे, ९०४९८१६०९०
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.