कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवरील कणेरी मठाच्या कृषी विज्ञान केंद्राने केवळ सहा मजुरांचा वापर होणारे यांत्रिकी पध्दतीचे आधुनिक गुऱ्हाळघर उभारले आहे. त्यातून पारंपरिक गुऱ्हाळासाठी जिथे पाऊण ते एक एकरपर्यंत जागा लागते, तिथे केवळ चार गुंठ्यात सेंद्रिय पद्धतीने गूळनिर्मिती शक्य केली आहे. कोल्हापूर शहरापासून काही किलोमीटरवर प्रसिद्ध कणेरी मठ आहे. मठाचे कृषी विज्ञान केंद्रही (केव्हीके) आहे. कोल्हापूर हा ऊस व दर्जेदार गुळासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. साहजिकच कृषी विज्ञान केंद्रानेही हे महत्त्व व ग्राहकांची मागणी ओळखून गूळनिर्मिती सुरू केली आहे. त्यासाठी सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून आधुनिक गुऱ्हाळघर उभारले आहे. पारंपारिक गुऱ्हाळासाठी चिपाड वाळविण्यासह साठवणुकीसाठी किमान पाऊण एकर ते एक एकरपर्यंत जागा तर १५ पर्यंत मजुरांची गरज भासते. मठाने विविध ठिकाणाहून यंत्रांचा ‘सेटअप’ उभारत ६० बाय १८ फुटात गुऱ्हाळ उभारले आहे. यात ‘क्रशिंग’साठी अतिरिक्त दोन गुंठे जागा लागते. म्हणजेच सुमारे चार चे पाच गुंठ्यात केवळ सहा मजुरांची मदत घेऊन गूळनिर्मिती शक्य केली आहे. अशी होते यांत्रिक पद्धतीने गूळनिर्मिती टप्पा १- प्रक्रिया निर्मिती
टप्पा ३ चिपाडाचा इंधन म्हणून वापर ऊस गाळलेले ओले चिपाड वाळविण्यासाठी ड्रायर महत्त्वाची भूमिका बजावतो. ड्रायरच्या एका टोकाला ब्लोअर बसविण्यात आला आहे. तो काहिलीच्या खाली असणाऱ्या चुलवाणाची उष्णता शोषून घेऊन ड्रायरमध्ये ढकलतो. या उष्णतेने ओले चिपाड वीस मिनिटांच्या कालावधीत कोरडे होते. ड्रायर फिरत असल्याने चिपाड आत चिकटून बसत नाही. त्याचा वापर त्वरित करणे शक्य होते. अध्या तासात चिपाड वाळविल्यानंतर ते पुन्हा चुलवाणाकडे बेल्टद्वारे नेले जाते. तिथे आवश्यक त्या प्रमाणात थेट चुलवाणात घातले जाते. येथे कोणत्याही मजुरांची गरज लागत नाही. आधणे संपेपर्यंत ही प्रक्रिया निरंतर चालते. यामुळे चिपाड गोळा करण्यासाठी देखील मजुरांची गरज भासत नाही. गुंतवणूक गुऱ्हाळ उभारणीसाठी सुमारे ३५ लाख रुपयांपर्यंत खर्च आला आहे. यंत्र साम्रुग्रीसाठी अठरा लाखांपर्यंत भांडवल लागले. उर्वरित खर्च बांधकामासाठी झाला. गुऱ्हाळाच्या रचनेत बदल करण्यासाठी खासगी व्यावसायिकाकडून यंत्रे तयार करून घेतली. आधुनिक गुऱ्हाळाचे फायदे -ऊस गाळल्यानंतर चिपाड गोळा करणे, ते वाळविण्यासाठी लांबवर नेऊन टाकणे, वाळलेले चिपाड पुन्हा पाटीतून चुलवाणाजवळ टाकणे, त्यात ते घालणे यासाठी प्रचलित गुऱ्हाळात मजुरांची संख्या पंधरापर्यंत लागते. परंतु आधुनिक गुऱ्हाळघरात प्रामुख्याने यंत्रांचा वापर केल्याने सहा मजुरांमध्ये काम होते. -साधारणतः: एका आधणासाठी तीन तासांपर्यंत वेळ लागतो. मात्र तीन काहिलींचा वापर केल्यास प्रक्रिया सुटसुटीत होऊन वेळेत बचत होते. प्रति काहीलीत १२५ ते १५० किलो गूळ तयार होऊ शकतो. एका दिवसात सहा ते आठ काहिली रस तयार करून गूळ तयार करता येतो. )पारंपारिक गुऱ्हाळात पाऊण ते एक एकरपर्यंत जागा लागते. आधुनिक पद्धतीत ६० बाय १८ फूट जागेत तसेच क्रशिंगसाठी दोन गुंठे अशी चार ते पाच गुंठे जागा पुरेशी होते. -पारंपरिक पद्धतीत चिमणीतून ज्वाला वाया जाते. हीच ज्वाला नव्या पद्धतीत ड्रायरसाठी वापरली जाते. -जुन्या पद्धतीत चिपाड त्वरित इंधन म्हणून वापरता येत नाही. नव्या पद्धतीत ड्रायरच्या साहाय्याने वाळवून त्वरित उपयोगात आणले जाते.
संपर्क- पांडुरंग काळे-७३५०८४४१०१ विषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कणेरी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.