परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. पाणीपुरवठा, सिंचन स्रोतांचे बळकटीकरण झाले आहे. वृक्षसंवर्धनातून गाव हिरवाईने नटले आहे. पीक पध्दतीच्या बदलातून गावाच्या आर्थिक विकासाला गती मिळाली आहे. परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक (ता.पाथरी) गावाची लोकसंख्या २७५० पर्यंत आहे. ग्रामपंचायत अंतर्गंत चार तांड्यांचा समावेश होतो. भौगोलिक क्षेत्र १३७८ हेक्टर, पैकी १३२४ हेक्टर लागवडीयोग्य आहे. १२११ शेतकरी खातेदार आहेत. जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात गावाचा समावेश होतो. मात्र धरण दरवर्षी भरण्याची खात्री नसते. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, ज्वारी, गहू, हरभरा, करडई आदी गावची मुख्य पिके आहेत. ठळक बाबी
पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली २२ गाव नळपाणीपुरवठा योजना, भारत निर्माण योजनेंतर्गत सार्वजनिक नळपाणीपुरवठा आदी योजना कार्यान्वित झाल्या. मात्र पाणीटंचाई थांबेना. मग महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नवीन विहिरी खोदल्या. आता गावाचा पाणी प्रश्न मार्गी लागला असून कुटुंबांना १७५ नळजोडण्या दिल्या आहेत. ग्रामस्थांच्या निरोगी आरोग्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे ‘आरओ’ फिल्टर संयंत्र बसविले .त्याव्दारे प्रति कुटुंबास पाच रुपये शुल्कात वीस लिटर शुध्द पाणी दिले जाते. परिणामी दूषित पाण्याव्दारे प्रसार होणाऱ्या आजारांना प्रतिबंध झाला आहे. गावतलावातील उपयुक्त पाणीसाठा सन १९७२ च्या दुष्काळात गावतलावाचे काम झाले. मात्र पाण्याची उपलब्धता असल्याने अनेक वर्षे त्यात पाणीसाठा केला जात नव्हता. सन २०१५-१६ मध्ये उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे गावाला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. ही बाब लक्षात घेत लोकसहभागातून तलावाची दुरुस्ती झाली. पावसाचे, कालव्याव्दारे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी तलावामध्ये साठविले जाते. सकाळ रिलिफ फंडातून तलावातील गाळ काढण्यात आला. परिणामी साठवण क्षमता वाढली. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावशिवारातील ओढे, नाल्यांवर सिमेंट बंधारे बांधले. आता परिसरातील जलस्त्रोतांची पातळी वाढली आहे. तलावाकाठी वृक्षलागवड झाली आहे. शेतरस्त्यांचे मजबुतीकरण.... शेतमालाची वाहतूक (विशेषतः ऊस वाहतुकीसाठी) अडचणी यायच्या.शेतकऱ्यांनी पुढाकार घेत लोकवर्गणी जमा केली. त्यातून एक किलोमीटर तसेच अन्य काही शेतरस्त्यांचे मजबुतीकरण झाले. गावविकासातील ठळक बाबी
गावात जिल्हा परिषदेची १ ते ७ इयत्ता पर्यंत शाळा, सहा अंगणवाड्या आहेत. तांड्यावर शिक्षणाची सुविधा आहे. ग्राम शिक्षण समितीच्या पुढाकारातून वर्गखोल्यांची रंगरंगोटी, सजावट होते. डिजिटल वर्गखोली या व्यवस्था केल्या आहेत. खोल्यांना किल्ल्यांची नावे दिली आहेत. फुलझाडांची लागवड करून शाळेचा परिसर सुशोभित केला आहे. विद्यार्थ्याच्या कलागुणांना चालना देण्यासाठी लोणी फेस्टिव्हलचे आयोजन केले जाते. लॉकडाऊनमध्ये शिक्षण चळवळ सुरू ठेवण्यासाठी ग्रामशिक्षण समिती गावातील घरे, सार्वजनिक इमारतीच्या भिंतीवर मुळाक्षरे, पाढे, विविध सूत्रे लिहिण्यात आली.
उपक्रमशील ग्रामपंचायत श्याम उत्तमराव धर्मे हे गावचे तरुण सरपंच आहेत. उपसंरपच गोविंद चव्हाण, सर्व सदस्य, महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष मुंजाभाऊ धर्मे, पोलिस पाटील रणजित गिराम, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष रामराव सौंदडे आदींसह युवक, ज्येष्ठ ग्रामस्थांचा विकास कामांत सक्रिय सहभाग असतो. गावातील अनेकजण भारतीय सैन्यदल सीमा सुरक्षादलात कार्यरत असून स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिनावेळी त्यांचा गौरव केला जातो. रक्तदान शिबिरे घेण्यात येतात.जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सांस्कृतिक सभागृह बांधले आहे. लॉकडाऊन काळात गावात अडकून पडलेल्या ऊसतोड कामगारांची काळजी घेण्यात आली. दर रविवारी आठवडे बाजार भरतो. शेतकरी गट
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.