जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब किंवा कर्ब-नत्र गुणोत्तराकडे अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे. जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांमध्ये सुधारणा करून शेतमालाची गुणवत्ता वाढवण्यामध्ये सेंद्रिय कर्बाचे मोलाचे महत्त्व आहे. या कर्बामागील विज्ञान, त्यामुळे घडणाऱ्या अभिक्रिया, कार्बन साखळी जाणून घेतल्यास शेतात आदर्श सेंद्रिय व्यवस्थापन कसे करायचे, याची दिशा स्पष्ट होईल. महत्त्व सेंद्रिय कर्बाचे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण जितके जास्त, तितका जमिनीचा पोत चांगला असतो. त्याचे कारण म्हणजे जमिनीत आपण दिलेली सेंद्रिय वा रासायनिक स्वरूपातील मुख्य वा दुय्यम अन्नद्रव्ये पिकांना मोठ्या प्रमाणात घेता येतात. याउलट सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असेल, तर दिलेली अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणात जमिनीत तशीच राहतात. जमिनीतील मुक्त चुन्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन क्षारांची निर्मिती होते. जमिनी क्षारयुक्त, चोपण होतात. सेंद्रिय कर्ब कमी का होतो? आपल्याकडील भौगोलिक परिस्थितीमुळे सेंद्रिय कर्बाची मात्रा अत्यंत कमी म्हणजे ०.०२ पासून ती जास्तीत जास्त ०.०६ टक्क्यांपर्यंत आहे. आपल्याकडे असलेल्या जास्त तापमानामुळे सेंद्रिय कर्बाचे ‘ऑक्सीडेशन’ होते. अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाल्यास प्राणवायू व सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे त्याचे ज्वलन होते. शेतामध्ये उसाचे पाचट, कडबा, भाताचे तूस जाळण्याच्या परंपरेमुळे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणखी कमी होत आहे. सेंद्रिय कर्बाचे फायदे
मातीतील सेंद्रिय कार्बन सेंद्रिय पदार्थांपेक्षा वेगळा कसा? मातीतील एकंदरीत सेंद्रिय पदार्थ थेट मोजणे तसे अवघड असते. त्यामुळेच प्रयोगशाळा मातीतील सेंद्रिय कर्ब मोजून त्याद्वारे मातीतील उपलब्ध सेंद्रिय पदार्थांबाबत (organic matter) अहवाल देतात. सेंद्रिय कर्बाची क्रमवारी असते. कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण कमी करून हवामानबदल कमी करण्याचा एक मार्ग म्हणून त्याकडे पाहिले जाते. असा युक्तिवाद आहे की, शेतजमीन आणि कुरणांखालील जमिनींत सेंद्रिय कर्बाची वाढ झाल्याने वातावरणातील कार्बन डाय ऑक्साइड लक्षणीय प्रमाणात कमी करता येऊ शकतो. ही घट दीर्घकाळ टिकण्यासाठी सेंद्रिय पदार्थ अधिक स्थिर असणे आवश्यक असते. मातीतील सेंद्रिय पदार्थ मातीतील सेंद्रिय पदार्थ प्रामुख्याने कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेला असतो.त्यातील अवशेषांमध्ये नत्र, स्फुरद, गंधक, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकांचे स्वरूप अल्प प्रमाणात असते. खालील घटक मातीत अस्तित्वात असतात.
मातीतील सेंद्रिय पदार्थांची साखळी मातीचा प्रकार, त्या प्रदेशातील हवामान, मातीचे केले जाणारे व्यवस्थापन, तिची जडणघडण किंवा विघटन क्षमता हे घटक मातीतील सेंद्रिय पदार्थांवर परिणाम करतात. मातीतील जैविक पदार्थांच्या जैव- रासायनिक क्रियांना वेग देणारा प्रमुख आणि महत्त्वाचा घटक म्हणजे पाऊस. पावसाचे पाणी मातीत मुरते तेव्हा सेंद्रिय पदार्थांचे विघटन होते. मातीत विरघळलेले सेंद्रिय घटक, ह्युमस आणि विघटन होण्यासाठी कठीण सेंद्रिय पदार्थ यांची एक साखळी तयार होते. सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे सूक्ष्मजीवही या साखळीत अविरत कार्य करीत असतात. सेंद्रिय पदार्थांच्या साखळीतील घटक
सेंद्रिय कर्ब आणि जमिनीच्या गुणधर्मांचे समीकरण भौतिक गुणधर्मात सुधारणा
रासायनिक गुणधर्म:
कर्ब- नत्र गुणोत्तर
आदर्श कर्ब-नत्र गुणोत्तर गुणोत्तराचे प्रमाण जेवढे जास्त तेवढा कुजण्यास वेळ जास्त लागतो. त्यामुळे असे सेंद्रिय पदार्थ कुजविण्यासाठी युरिया, विघटन करणारी जैविक खते वापरावी लागतात. म्हणजे कर्ब- नत्र गुणोत्तर जास्त असलेल्या सेंद्रिय द्रव्यांचे विघटन होऊन ते ११-१ पासून २०-१ पर्यंत कमी होते. कमी झालेल्या या गुणोत्तरामुळे सेंद्रिय स्वरूपातील नत्र, स्फुरद, गंधक आणि सूक्ष्मद्रव्यांचे रूपांतर रासायनिक स्वरूपात होते. ते पिकांना उपलब्ध होते. मात्र २०-१ गुणोत्तरापेक्षा अधिक कर्ब - नत्र असेल तर ती सर्व अन्नद्रव्ये सेंद्रिय स्वरूपात परावर्तित होऊन त्याचे स्थिरीकरण होते. पिकांना ती उपलब्ध होत नाहीत. साधारणतः १३-१ ते १६-१ हे गुणोत्तर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने अधिक उपयुक्त ठरले आहे. आदर्श गुणोत्तराचा सकारात्मक परिणाम
(लेखक आंतरराष्ट्रीय सेंद्रिय प्रमाणीकरण अधिकारी व सेंद्रिय शेती विषयातील तज्ज्ञ आहेत.) संपर्क- डॉ. प्रशांत नायकवाडी-८८८८८१०४८६, ९६२३७१८७७७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.