रांजणगाव देवी (ता. नेवासा, जि. नगर) येथील संयुक्त पेहरे कुटुंबाने परिश्रम व चिकाटीतून माळरान विकसित केले. पाण्याची शाश्वती साधून नवे प्रयोग आणि फळपिकांना प्राधान्य दिले. केळी, सीताफळ, आंबा, ॲपल बेर, कलिंगड अशी विविधता व त्यास बाजारपेठ व्यवस्था उभारून कमी पावसाच्या प्रदेशात समृद्धी आणली. नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील पूर्व भागात अनेक भागांत पाण्याची टंचाई आहे. . मुळा धरणाचे पाणी पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे पूर्वी शेतकरी कोरडवाहू पिके घेत. आता कालव्यातून पाच किलोमीटर अंतरावरुन पाणी आणत कांदा, गहू, हरभरा अशी पिके घेतली जात आहेत. पेहरे यांचे प्रयत्न तालुक्यातील रांजणगाव देवी येथील सोपानराव पेहरे यांचा पत्नी सुमनबाई, मुले राजेंद्र, संजय, संतोष सुना आणि नातवंडे असा एकत्रित परिवार आहे. त्यांची पन्नास एकर जमीन होती. पैकी चाळीस एकर माळरान खडक होता. त्यातून ओढा वाहायचा. जमिनीच्या दुरुस्तीसाठी पैसा नव्हता. सात-आठ एकर क्षेत्रच वहितीखाली होते. त्यालाही पाणी नव्हते. ज्वारी, बाजरी आदी कोरडवाहू पिकांवरच समाधान मानावे लागे. जोड म्हणून पेहरे यांनी गावांत किराणा दुकान सुरु केले. मग पैसे उपलब्ध होतील तशी माळरानावर सुधारणा सुरु केली. १९९८ मध्ये सुरु केलेले हे काम चार वर्षे चालले. जमिनीची ‘लेव्हल’ झाली. नाल्यातून माती आणून टाकली. टप्प्याटप्प्याने ३६ एकर शेतीची दुरुस्ती केली. आर्थिक नियोजन उत्तम साधत टप्प्याटप्प्याने दहा एकर जमीन खरेदी केली. पाण्याचा प्रश्न अजून सुटायचा होता. जुन्या विहिरीचे पाणी आटले. विंधनविहीर खोदली. त्यालाही पुरेसे पाणी निघाले नाही. मग पाच किलोमीटरवर असलेल्या मुळा धरणाच्या कालव्याजवळ नातेवाईकांकडून दोन गुंठे जागा घेऊन विहीर खोदली. तिथून पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध केले. फळबागा केंद्रित शेती सन २००१ मध्ये जमिनीची सुधारणा झाल्यानंतर फळपिकांकडे लक्ष केंद्रित केले. दोन एकरांत भगवा डाळिंबाची लागवड केली. खरं तर कुटुंबाचे पहिलेच फळपीक असल्याने पुरेसा अभ्यास नव्हता. अनुभवी शेतकऱ्यांकडून सल्ला-मार्गदर्शन घेत व्यवस्थापनातून चांगले उत्पादन ते घेऊ लागले. सन २००४ पासून पारंपारिक पिकांना फाटा देत केळी मग आंबा, त्यानंतर सीताफळ अशी टप्प्याटप्प्याने पिके वाढवण्यास सुरवात केली. संतोष यांनी डी फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. एका भावासह त्यांनी शेतीच समृद्ध करण्याला प्राधान्य दिले. शेती व व्यवस्थापनातील काही बाबी
बाजारपेठ डाळिंबाची नाशिक व नंतरच्या काळात राहाता बाजार समितीत विक्री केली. सन २०१७ मध्ये तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाग काढली. दर्जेदार उत्पादनामुळे स्थानिक व्यापारी, ग्राहकांना विश्वास मिळाल्याने जागेवर तसेच नजीकच्या बाजारपेठांमध्ये विक्री करून अधिकचा नफा मिळवतात. नगर, घोडेगाव, राहाता, पुणे येथेही माल पाठवतात. केळीला गणपती व पुढे दिवाळीपर्यंत मागणी अधिक असते. हा अभ्यास करून सर्व पिकांचे नियोजन असते. उल्लेखनीय बाबी
संपर्क- संतोष पेहरे-८२०८६५४००८
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.