आपटी (जि. रत्नागिरी) येथील वसंत केरू गायकवाड यांनी प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून नाव कमावले आहे. कोकणातील नेहमीच्या पिकांबरोबर वर्षभर सुमारे १५ प्रकारच्या विविध भाजीपाला पिकांचे व तेही सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यात ते प्रसिद्ध आहेत. केवळ उत्पन्न कमावणे, हा हेतू न ठेवता मातीची सुपीकता व सेंद्रिय कर्ब जपण्यालाही त्यांनी तेवढेच महत्त्व दिले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील आपटी येथे वसंत केरू गायकवाड यांची सहा एकर शेती आहे. मुंबई विद्यापीठातून बीएससीची पदवी घेतलेले वसंत रायगड जिल्ह्यात खासगी शिकवणी करायचे. शेती हाच पूर्णवेळ व्यवसाय करायचा, हे नक्की केल्यानंतर ते आपटी गावी आले. कोडदाई नदीच्या बाजूलाच त्यांची जमीन आहे. सुमारे पंचवीस फूट खोल मुबलक पाणी असलेली विहीर आहे. स्वतः भाजीपाला घेताना शेजारील शेतकऱ्यांनाही वसंत यांनी भाजीपाला शेतीस प्रोत्साहन दिले. आपल्या विहिरीतून त्यांना पाणीही पुरवले. बघताबघता आपटी गावात भाजीपाला शेती वाढण्यास सुरुवात झाली. वसंत यांची शेतीपद्धती
मातीकडे सर्वाधिक लक्ष रासायनिक निविष्ठांच्या वापरामुळे जमीन आणि मानवी आरोग्याचेही नुकसान होते हे ओळखून मातीची सुपीकता आणि सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर भर दिला. अलीकडील वर्षांत ते पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करतात. त्यासाठी पीक अवशेष जमिनीत गाडतात. मातीपरीक्षण अहवालानुसार, आपल्या मातीचा सेंद्रिय कर्ब दोन टक्क्यांपर्यंत असल्याचे वसंत सांगतात. साहिवाल, कांकरेज व लाल सिंधी अशा मिळून सहा देशी गायी आहेत. त्यांचे दररोज ३० किलो शेण उपलब्ध होते. नॅडेप पद्धतीने ते खत तयार करतात. गोमूत्रापासून घनामृत तयार करून संपूर्ण क्षेत्राला वापरतात. वनस्पती अर्कांपासून कीडनाशके तयार करतात. दापोली तालुक्यात सक्रिय असलेल्या शेतकरी गटाचे वसंत सदस्य आहेत. या गटालादेखील वसंत कीडनाशके देतात. विक्रीव्यवस्था
शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी
दुग्धव्यवसायाची जोड तीन गायींना पूर्णिमा, राधा आणि तुळसी अशी नावे दिली आहेत. दररोज सहा लिटर दूध मिळते. गावात वैद्यकीय महाविद्यालय आहे. तेथील कॅन्टीनला ७० रुपये प्रतिलिटर दराने दररोज पाच लिटर दुध पुरवण्यात येते. त्यातून महिन्याला उत्पन्नाचा चांगला आधार होतो. मागणीनुसार तुपाची विक्रीही तीन हजार रुपये प्रतिकिलो दराने होते. कष्टासोबत समाधानही आले वसंत म्हणतात की शेतीत कष्ट आहेत, तितकेच समाधानही आहे. भाजीपाला व्यवसायाने मला सुखी केले आहे. गावातील शेतमजुरांना ते हंगामानुसार रोजगार उपलब्ध करून देतात. गावात जांभा दगडाचे घर बांधले आहे. आंब्याची सुमारे २५; तर काजूची २०० झाडे आहेत. भाजीपाला शेतीकडे अधिक वेळ द्यावा लागत असल्याने या फळपिकांकडे तेवढे लक्ष देता येत नाही. तरीही ही पिके समाधानकारक उत्पन्न देऊन जातात. प्रयोगशीलतेचा सन्मान नेहमीच प्रयोगशील वृत्ती ठेवलेल्या वसंत यांना तालुकास्तरीय राजवैभव, जिल्हास्तरीय सेवानिवृत्त शिंदे पुरस्कार, राज्याचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, बळीराजा अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. संपर्क- वसंत गायकवाड- ९२७३११७४७१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.