खुमारी (जि. नागपूर) येथील श्रीनिवास पांडे यांनी यंदा तीन एकरांत ‘एसआरटी’ तंत्राचा वापर करून दुष्काळी स्थितीतही भाताचे उत्पादन एकरी तीन क्विंटलने वाढवले. चिखळणी, मळणी, रोवणी, तसेच मजुरी व निविष्ठा खर्चात मोठी बचत केली. भातानंतर गहू घेताना शून्य मशागत तंत्राचा वापर करून मशागत खर्चातही बचत केली. प्रयोगशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी आपला प्रयोग यशस्वी साधला आहे. खुमारी (ता. रामटेक, जि. नागपूर) येथील श्रीनिवास पांडे यांची सुमारे साडेआठ एकर शेती आहे. संगणकीय विज्ञान या शाखेतील पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे. वर्तमानपत्र व प्रसारमाध्यम विषयांतील दोन संस्थांच्या माध्यमातून त्यांनी तांत्रिक विभागात सुमारे २३ वर्षे नोकरी केली. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून त्यांनी हे क्षेत्र पूर्णपणे सोडून देत शेतीच करणे पसंत केले आहे. आता ते पूर्णवेळ शेतकरी झाले आहेत. ‘एसआरटी’ तंत्राचा प्रयोग पांडे यांना शेतीची आवड होतीच. मात्र, पूर्वी नोकरीमुळे त्यात वेगवेगळे प्रयोग करून पाहणे शक्य होत नव्हते. मात्र, प्रयोगशीलतेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच मागील वर्षी रायगड, कर्जत या भागात काही कामानिमित्त गेले असता, तेथे एसआरटी (सगुणा राईस टेक्निक) पद्धतीने भात लागवड पाहण्यास मिळाली. प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी ही पद्धत विकसित केल्याचे त्यांना सांगण्यात आले. या पद्धतीचे फायदे लक्षात आल्यानंतर आपणही त्याचा प्रयोग करून पाहावा, असे पांडे यांनी ठरवले. मार्गदर्शनानुसार शेती सुरू पांडे कायम भडसावळे यांच्या संपर्कात होते. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी एसआरटी तंत्राद्वारे भातशेती सुरू केली. त्यातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे
खर्च, वेळ, श्रम वाचवणारी एसआरटी पद्धत
मजूरबळ लागले कमी
पिकाला होतो फायदा दोन बेडसमध्ये पुरेसे अंतर ठेवल्याने हवा खेळती राहते. त्याचा पुढे उत्पादनावर परिणाम होतो, असे पांडे यांचे निरीक्षण आहे. या पद्धतीत युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर शक्य होतो. जिथे पारंपरिक पद्धतीत रासायनिक खतांचे तीन डोसेस द्यवे लागतात, तिथे या पद्धतीत एक डोस व त्यावरील खर्च वाटल्याचे ते म्हणाले. खत वाहून जाण्याचा धोका राहात नाही. थेट मुळांना खत मिळत असल्याने कमी मात्रेमध्ये त्याची परिणामकारकता साधता येते. किडीचा प्रादुर्भाव कमी झाला प्रतिकूल वातावरणात खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. परंतु एसआरटी पद्धतीत हवा खेळती राहते. तसेच शेतात फवारणीसाठी फिरणे सोयीस्कर होत असल्याने फवारणी चांगली होऊन खोडकिडीवर नियंत्रण मिळविणे शक्य होते. पारंपरिक पद्धतीत मात्र तास सोडलेला नसल्याने किडी- रोग निरीक्षणावेळी अडचणी येतात. त्यामुळे किडी-रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो, असे पांडे सांगतात. झालेले फायदे- ठळक बाबी
उत्पादनात वाढ
संपर्क- श्रीनिवास पांडे-९४२३४०७०२७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.