कोणत्या बाजारात केव्हा, काय का चालतं? कितीला विकलं जातं याबाबत सुभाष शर्मा यांना दररोज इत्यंभूत माहिती असते. एखादे पीक लावण्याची वेळ काय असावी? ते कोणत्या स्वरूपात विकले तर पैसे अधिक होतील या बाबी ओळखण्यात त्यांचा हातखंडा तयार झाला आहे. आपल्याकडे अनेक दुर्लक्षित, फारशी चर्चेत नसलेली पण ‘हटके’ पिके आहेत. काही गुंठ्यात हजारो रुपयांचे उत्पन्न देण्याची क्षमता त्यांच्यात आहे. शर्मा यांची ती हुकमी पिके आहेत. शर्मा यांचे विक्रीचे तीन महामंत्र
वालाच्या शेंगांची शेती शर्मा यांची वालाच्या शेंगांची शेती त्यादृष्टीने अभ्यासण्याजोगी आहे. जूनमध्ये त्याची लागवड होते. ऑक्टोबरच्या शेवटी तोडे सुरू होतात. पंधरा गुंठ्यातील अलीकडील अनुभव सांगायचा तर नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी असे तीन महिने दररोज एक क्विंटल शेंग बाजारात जायची. तीन महिने म्हणजे ९० दिवस. दर सोमवारी मार्केट बंद राहते. म्हणजे तीन महिन्यातील हे १२ दिवस वगळूया. म्हणजे ७८ दिवस पकडले तरी दररोज एक क्विंटल म्हणजे ७८ क्विंटल शेंगा विकल्या. किलोला २०, ३० रुपयांपासून काही वेळेस कमाल ४० रुपये दर मिळत होता. दर २० रुपये धरला तरी रोजचे २००० रुपये मिळायचे. म्हणजे ७८ दिवसांत एक लाख ५६ हजार रु. उत्पन्न हाती आले. यात ४० टक्के उत्पादन खर्च होतो. फेब्रुवारीत थंडी पडली की झाडांना अजून बहार येतो. तो साधारण मार्चपर्यंत टिकतो. मग ३० ते ४० दिवसांच्या काळात १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. त्याला दहा रुपये दर धरला तरी दहा हजार रुपये मिळतात. बी घरचे. कोणती फवारणी नाही की रासायनिक खते नाहीत. म्हणजे १५ गुंठ्यात एक लाख ६६ हजार रुपये मिळाले. क्षेत्र केवळ १५ गुंठेच शर्मा सांगतात की १५ गुंठ्यात सुमारे एक लाख ६० हजार रुपये मिळतात याचा अर्थ हे पीक वाढवून अजून नफा कमवायचा असे नाही. कारण बाजारपेठेतील मागणी व पुरवठा हे गणित मांडून १५ गुंठ्यापुरताच हा नफा मर्यादीदित आहे. अजून माल बाजारात आणाल तर दरांची हमी मिळणार नाही. म्हणजे एखाद्या पिकासाठी किती क्षेत्र द्यायचे याचाही विचार हवा. या वालाची वैशिष्ट्ये, फायदे
इंदुरी धण्याची शेती शर्मा सांगतात की कोथिंबीर (इंदुरी धणे) हे आमचे व्यावसायिक, शिवाय पर्यावरणीय पीक आहे. हजारोंच्या संख्येने त्यावर मधमाश्या येतात. परागीभवन करतात. मग उत्पादन आणि गुणवत्ताही वाढते. आधी हिरव्याचा (ताजी कोथिंबीर) पैसा करायचा. नंतर बियाण्याचा. असे असते अर्थकारण
पर्याय २- आधी हिरवे, मग धणे
फायदा
सेंद्रिय धणे विका १३० रुपयांनी शर्मा शेतकऱ्यांना आवाहन करतात की, शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गटशेती केली असेल तर इंदुरी धण्याचा सेंद्रिय ब्रॅंड तयार करा. किलोला १३० रुपये दराने त्याची विक्री करणे शक्य होऊ शकते. शर्मा यांनी आता धणे पावडर निर्मितीही सुरू केली आहे. त्याची होलसेलसाठी १३० रुपये तर रिटेलसाठी १५० रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे. प्रतिक्रिया गुणवत्तापूर्ण बियाणे तयार होण्यात मधमाश्यांचा वाटा मोठा आहे. पूर्वी हजारोंच्या संख्येने आमच्या शेतात मधमाश्या असायच्या. नैसर्गिक शेती असूनही दरवर्षागणिक त्यांचे प्रमाण कमी होत चालले ही अत्यंत चिंतेची बाब आहे. आईनस्टाइनने म्हटल्याप्रमाणे मधमाश्या संपल्यानंतर मानवाचे आयुष्य तीन वर्षांपर्यंतच आहे. म्हणजे पुढील तीन वर्षांत आपल्याला राम नाम सत्य है ची तयारी करावी लागेल काय, असा प्रश्न उभा राहतो. आपण रासायनिक फवारण्या बंद करू तेव्हाच मधमाश्या जगतील. -सुभाष शर्मा संपर्क- ८८३०१७४६६१
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.