बाजारपेठेतील मागणीनुसार व्यावसायिक पीक पद्धतीची रचना हे सुभाष शर्मा यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब वाढविण्याबरोबर आर्थिकदृष्ट्या सधन होण्यावर शर्मा यांचा भर असतो. वांगे हे बहुतांशी शेतकऱ्यांचे मुख्य वा सामाईक पीक आहे. शर्मा यांचेही ते हुकमी पीक. कोणतीही रासायनिक खते, कीडनाशके यांचा वापर न करता केवळ नैसर्गिक शेतीच्या आधारे हे पीक कमी खर्चात यशस्वी करण्याची किमया त्यांनी घडवली आहे. मागील वर्षी (२०१८) एक एकरात वांगी प्लॉट होता. त्याचे प्रातिनिधिक उदाहरण अभ्यासूया. आदर्श वांगी व्यवस्थापन लागवडपूर्व तयारी शर्मा सांगतात की, वांगी घेण्यात येणारी जमीन आम्ही आधीच चांगली सुपीक करून घेतलेली असते. वांग्याआधी या जमिनीत सोयाबीन तर त्याआधी तूर होती. हिरवळीचे खत होते. सोयाबीन लावले त्या वेळी एकरी चार ट्रॉली शेणखत टाकले होते. एवढ्या सगळ्या पौष्टिक खाद्यावर पोसलेली ही जमीन वांग्याचे चांगले उत्पादन देणार याची आम्हाला खात्री असते. लागवडीची वेळ शर्मा म्हणतात की, नैसर्गिक शेतीचे शास्त्र सांगते पावसाळा हा वांगी लागवडीसाठी अजिबात अनुकूल काळ नाही. कारण त्या काळात त्यावर प्रचंड कीड येते. त्याची योग्य वेळ ऑक्टोबर हीच आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस (पिकाच्या नैसर्गिक वेळेत) आम्ही वांगी लावतो. त्यासाठी १५ सप्टेंबरच्या दरम्यान रोपे तयार करतो. आंतरपिके
मेथीनंतर कोथिंबीर
उत्पादनाचे गणित
उत्पादन व ताजा पैसा यांचा मेळ
आपण श्रीमंत कधी होऊ? शर्मा म्हणतात की, एक झाड चार ते पाच किलो उत्पादन देत असेल व किलोला १० रुपये दर मिळाला तर एक झाड ४० ते ५० रुपये देऊ शकते. एकरात पाच हजार झाडे असतील तर या हिशेबाने त्याचे दोन ते अडीच लाख रुपये मिळतात. पण आपण गट तयार केला. सेंद्रिय, आरोग्यदायी वांगे असे त्याचे मार्केटिंग केले व सामूहिकरीत्या २० रुपये दर निश्चित केला तर हेच वांगे एकरी दुप्पट म्हणजे चार ते पाच लाख रुपये देऊ शकते. श्रीमंत होण्याचा हाच मार्ग आहे. मिळणाऱ्या एकूण उत्पन्नात ४० टक्के खर्च असतो. शंभर नाकवाल्यांत एकच नकटा या आंतरपिकांत मक्याची ५० झाडे लावली असती तर वांगे अजून सुरक्षित झाले असते. आमच्याकडे किडके वांगे शक्यतो पाहायला मिळायचे नाही, असे सांगताना शर्मा उपमा देतात. शंभर नकट्यांत एकच नाकवाला अशी म्हण आहे. पण आमच्या इथे तर शंभर नाकवाल्यांत एकच नकटा दिसतो. इथं मी झाडं, पाखरं, मित्रकीटक जगवली. त्यांच्या माध्यमातून किडींची अंडी खाल्ली गेली. पाखरांनी किडींचे पतंग खाल्ले. नैसर्गिक शेती फायद्याची करायची असल्यास ज्ञान पणाला लावायला लागेल. योजकता अचूक करावी लागेल. श्रमाचा भरपूर वापर करावा लागेल.
प्रतिक्रिया श्रम करणारे केवळ मालक आणि मजूर नाहीत, तर जीवजंतू, बैल, गायी, पक्षी या सर्वांनी कष्ट केले तेव्हा कीड नियंत्रण झाले. जेव्हा त्यांना आपण जगू देऊ तेव्हाच ते घाम गाळतील. -सुभाष शर्मा
शर्मा यांच्या महत्त्वाच्या टिप्स
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.