रजाळे (ता.जि.नंदुरबार) येथील कैलास, संजय व नगराज या पाटील बंधूंनी वषर्भरातील तीन हंगामात कलिंगड घेण्याची पीकपध्दती यशस्वी केली आहे. रमजान, नवरात्र व उन्हाळी हंगाम या काळातील कलिंगडाची मागणी त्यांनी लक्षात घेतली. त्यानुसार सुधारीत तंत्राद्वारे लागवडीचे व विक्रीचे नियोजन केले. आज व्यापाऱ्यांमध्ये पाटील बंधूंच्या कलिंगडाने वेगळी ओळख तयार केली आहे. नंदूरबार शहरापासून काही किलोमीटरवर असलेल्या रजाळे येथे संजय, कैलास व नागराज हे पाटील बंधू राहतात. त्यांची सुमारे ४५ एकर शेती आहे. त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. हलकी ते मध्यम स्वरुपाची जमीन या भागात आहे. पावसाळा काही वेळेस जोरदार स्वरुपाचा असतो. यामुळे कापसाचे पीक अनेकदा वाया गेल्याचे प्रकार या भागात घडले आहेत. पाटील बंधू कापूस घेत नाहीत. कलिंगड हे त्यांचे हुकमी पीक आहे. त्यासोबत पपई, कांदा, मिरची यांचीही लागवड ते करतात. चार विहिरी व एक कूपनलिका आहे. पाऊस चांगला झाला तर जलस्त्रोत टिकून असतात. यंदा कमी पावसामुळे उन्हाळ्यात पिके घेणे त्यांना शक्य झाले नाही. कलिंगड शेतीचे नियोजन
तीन हंगामात होते लागवड- हंगाम
मल्चिंगचा झाला फायदा एकदा पावसाळा जास्त होता. कलिंगड संवेदनशील पीक असल्याने रोपांच्या वाढीवर परिणाम झाला. पीक वाया गेल्याचीच स्थिती होती. यामुळे पाटील उंच गादीवाफा व मल्चिंग तंत्रज्ञानाकडे वळले. मल्चिंगमुशे उन्हाळ्यात व ऑक्टोबरमध्ये तापमान नियंत्रित राहते. वाफसा कायम राहतो. यामुळे पाण्याची बचत होते असा अनुभव त्यांनी घेतला आहे. व्यवस्थापनातील ठळक बाबी
यंदाची स्थिती यंदा दुष्काळी स्थितीमुळे कलिंगडाचा दुसरा हंगाम साधणे कदाचित शक्य होणार नसल्याचे पाटील सांगतात. विक्री व्यवस्था काढणी जशी सुरू होईल त्यापूर्वीच व्यापाऱ्यांच्या संपर्कात पाटील असतात. दर व्यवस्थित मिळतील यासंबंधी ते बाजाराचा अंदाज घेतात. बेटावद (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथील व्यापाऱ्यांना सद्यःस्थितीत विक्री केली जात आहे. व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. त्यामुळे बाजारपेठेत जाण्याची गरज पडत नाही. साधारण तीन दिवसांत संपूर्ण चार ते पाच एकरांतील कलिंगडाची काढणी होते. प्रतवारीवर भर दिला जातो. कारण त्यानुसारच दर हाती पडतात. मिळालेले दर (किलोचे)
अन्य पिकांतही हातखंडा पाटील बंधूंकडे मोठा व छोटा ट्रॅक्टर आहे. कलिंगडाव्यतिरिक्त अन्य पिकांतही त्यांचा हातखंडा आहे. पपईची पाच ते सहा एकरात, कांद्याची १० एकर, मिरचीची पाच ते सहा एकरांवर त्यांची लागवड असते. उर्वरित तृणधान्यही असते. पपईचे एकरी ३० टनांपर्यंत तर मिरचीचे हिरवी व ओली मिळून एकरी २० टनांवर उत्पादन घेण्यात येते. पपईची विक्री शिंदखेडा (जि. धुळे) व नंदुरबार भागातील व्यापाऱ्यांना तर मिरचीची विक्री नंदूरबार बाजार समितीत होते. यंदा कांद्याची काढणी ऑक्टोबरपूर्वीच झाली. तेव्हा दर टिकून होते. त्यामुळे दरांचा लाभ मिळाला. कमी पाण्यात व कमी कालावधीत येणाऱ्या पिकांना पसंती दिली जाते. पाण्याचा काटेकोर वापर होण्याच्या दृष्टीने सुधारित तंत्रज्ञानावर भर देण्याचा संकल्प पाटील बंधूंनी केला आहे. संपर्क- संजय पाटील-९९२१६७२०७४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.