वाशीम जिल्ह्यात रब्बीच्या २५ टक्के पेरण्या आटोपल्या

वाशीम जिल्ह्यात रब्बीच्या २५ टक्के पेरण्या आटोपल्या
वाशीम जिल्ह्यात रब्बीच्या २५ टक्के पेरण्या आटोपल्या

वाशीम  ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची लागवड जोमाने सुरू झालेली असून आत्तापर्यंत सुमारे २५ टक्के क्षेत्र लागवडीखाली आले आहे. जिल्ह्यात सरासरी ९२९९६ हेक्टर लागवड क्षेत्र असून आत्तापर्यंत २२५४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परतीच्या पावसाने वाशीम जिल्ह्याच्या खरीप हंगामालाही मोठा फटका दिलेला आहे. सोयाबीनचे आगार समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ही बाजूला सारत शेतकरी रब्बीसाठी पुढे येत आहे.  दरम्यान, जिल्ह्यात या हंगामात लागवडीसाठी कृषी यंत्रणेने ९२ हजार ९९६ हेक्टरचे नियोजित क्षेत्र दाखविलेले आहे. यात प्रामुख्याने वाशीम तालुक्यात  २१४१६, मालेगाव तालुक्यात १०६१२, रिसोड ३०९०४, मंगरुळपीर १०९९२, मानोरा १२६९६ आणि कारंजा तालुक्यातील ६३७६ हेक्टरचा समावेश आहे. जमिनीतील ओलाव्यामुळे रब्बी लागवडीला याही जिल्ह्यात विलंब झाला. रब्बी लागवडीचा आढावा घेतला असता आत्तापर्यंत २४.२४ टक्के क्षेत्र म्हणजेच २२५४३ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. यात सर्वाधिक लागवड  १७०००१ हेक्टरवर हरभऱ्याची झाली आहे. यानंतर गव्हाची ५३०१ हेक्टरवर पेरणी झाली. रब्बी ज्वारीचे लागवड क्षेत्र ११९, करडई ७१ हेक्टर आहे.  दरवर्षी नोव्हेंबरमध्ये लागवडीचे क्षेत्र ४० टक्क्यांपेक्षा अधिक राहते. यंदा त्याला सुरुवातीपासून विलंब होत गेला. परतीचा पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना विलंब होत राहिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com