पांगरी नवघरे येथील शेतकरी भारनियमनामुळे झालेत त्रस्त

पांगरी नवघरे येथील शेतकरी भारनियमनामुळे झालेत त्रस्त
पांगरी नवघरे येथील शेतकरी भारनियमनामुळे झालेत त्रस्त

पांगरी नवघरे जि. वाशीम ः अमानी येथील ३३ केव्हीअंतर्गत बऱ्याच गावांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, गावांना कधीही सुरळीत वीजपुरवठा मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.   शेतकऱ्यांनी संपर्क साधला तर समाधान होत नाही. ग्रामीण भागात पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत आणि दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत भारनियम ठेवण्यात केले जाते. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे शेतामधील कृषिपंप व्यवस्थित चालत नाहीत. शेतकऱ्यांना आठ तास वीज देण्यात यावी, ही वर्षानुवर्षे मागणी कायम आहे. मात्र, याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. पांगरी नवघरे भागात सध्या रात्रीला आठ तास वीज देण्यात येत आहे आणि त्याच सब स्टेशनमध्ये दुसरीकडील गावांमध्ये चार-चार तासासाठी वीजपुरवठा केला जातो. खरीप हंगामातील पिके हातची गेल्यामुळे आता सर्वस्व रब्बीवर अवलंबून आहे. मालेगाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा या पिकांची पेरणी झाली आहे. जमेल त्या मार्गाने शेतकरी सिंचनाचा प्रयत्न करीत आहेत. वीजपुरवठ्यातील हलगर्जीपणामुळे आज जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळेस पाणी द्यावे लागते आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com