वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा : शेतकऱ्यांची निदर्शने

वाघाविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने
वाघाविरोधात शेतकऱ्यांची निदर्शने

चंद्रपूर  ः राजुरा तालुक्‍यात नरभक्षक वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे प्रभावित झाली आहेत. त्याची दखल घेत या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. २४) वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून या विरोधात निदर्शने करण्यात आली.  राजुरा तालुक्‍यातील बहुतांश गावांमध्ये शेती हेच एकमेव उपजीविकेचे साधन आहे. शेतकरी आणि शेतमजुरांची संख्यादेखील या भागात सर्वाधिक आहे. सद्य:स्थितीत कापूस वेचणी, धान चुरणे, तूर तोडणी सुरू आहे. अशातच परिसरात नरभक्षक वाघाने धुमाकूळ घातल्याने शेतीकामे मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहेत. शेतातील पिकाच्या रखवालीसाठी अनेक शेतकरी शेतात रात्री जागलीसाठी जातात. त्यांचा जीव धोक्‍यात असल्याने या वाघाचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे. यासाठी शेतकऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढला. यामध्ये प्रदीप बोबडे, विठ्ठल बदखल, सुनील मुसळे, दिनेश पारखी, बालाजी भोंगळे, मेघा धोटे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात संतोष दोरखंडे, योगेश आपटे, अरविंद वांढरे, दादाजी राऊत, अमोल राऊत, सच्चिदानंद रामटेके, भास्कर वांढरे, नानाजी ढवस, नत्थु धोंगळे, देविदास कावळे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com