सिन्नर तालुक्यात दरवाढीमुळे कांदा रोपांची होतेय चोरी!

सिन्नर तालुक्यात दरवाढीमुळे कांदा रोपांची होतेय चोरी!
सिन्नर तालुक्यात दरवाढीमुळे कांदा रोपांची होतेय चोरी!

नाशिक : अतिवृष्टीमुळे कांद्याच्या रोपांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली असल्याने रोपांची उपलब्धता गरजेनुसार होत नाही. एकीकडे उन्हाळ कांद्याने बाजारात १० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे चालूवर्षी पाण्याची उपलब्धता आहे, त्यामुळे कांदा उत्पादकांचा कांदा लागवडीकडे कल दिसून येतोय, मात्र थोड्याफार प्रमाणात कांद्याची रोपे शिल्लक आहेत. याच कारणाने रोपांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. उपलब्धता व दरवाढीच्या कारणामुळे जिल्ह्यात कांद्याची रोपांची चोरी होत असल्याचे समोर आले आहे.  सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी भिमा लक्ष्मण गिते यांच्या देशवंडी शिवारातील गट नंबर. ४५१ या क्षेत्रातुन चोरट्याने लागवडीयोग्य झालेले कांद्याच्या रोपांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी चाळीतून कांदा चोरीचे - चोरीच्या घटना घडल्या आहेत; मात्र आता कांदा रोपांचीच चोरी होऊ लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कांदा रोपांची चोरी अन् हजारोंचे नुकसान  अतिपावसमुळे रोपे मोठ्या प्रमाणावर खराब झाले असून पहिल्या टप्प्यात लागवडी सुरू आहेत. मात्र रोपांची टंचाई असल्याने दुसऱ्या टप्प्यात लागवडी करण्यासाठी पुन्हा रोपवाटिका तयार करण्याची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कांदा बियाण्याचा दर २ ते ३ हजार रु किलो दर आहे तर एकरसाठी लागणाऱ्या रोपांचा दर ३५ ते ४० हजारांवर आहे. नायगाव खो-यात गेल्या काही दिवसांपासून शेतातील औजारे, कृषीपंप, केबल आदी वस्तूंच्या चोऱ्यांची संख्या वाढली आहे. अशातच थेट रोपांची चोरी झाल्याने त्यांचे १० ते १५ हजारांचे नुकसान झाल्याचे श्री. गिते यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com