मराठवाड्यात २६ लघु प्रकल्प कोरडेठाक

दुसरीकडे मराठवाड्यातील ८७५ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ३४ टक्क्यांवर आला आहे. यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पात ४० टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात २५ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात केवळ १७ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात ३४ टक्के तर तेरणा,मांजरा व रेना नदीवरील २५ बंधाऱ्यात असलेल्या ६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा याचा समावेश आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

औरंगाबाद: मराठवाड्यातील ८७५ लघु-मध्यम, मोठ्या प्रकल्पासह बंधाऱ्यामधील उपयुक्त पाणीसाठा ३३.९९ टक्केवर आला आहे. दुसरीकडे ७४४ लघु प्रकल्पांपैकी २६ प्रकल्प कोरडेठाक पडले असून हिंगोलीच्या सिद्धेश्वर प्रकल्पात उपयुक्त पाण्याचा थेंब नाही. २०५ लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

अलीकडच्या तीन-चार दिवसात मराठवाड्यातील काही भागात पावसाची हजेरी लागणे सुरू झाले आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील ८७५ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ३४ टक्क्यांवर आला आहे. यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पात ४० टक्के, ७५ मध्यम प्रकल्पात २५ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात केवळ १७ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात ३४ टक्के तर तेरणा,मांजरा व रेना नदीवरील २५ बंधाऱ्यात असलेल्या ६९ टक्के उपयुक्त पाणीसाठा याचा समावेश आहे.

मध्यम प्रकल्पांपैकी बीड व उस्मानाबादमधील प्रत्येकी दोन व नांदेडमधील एक मिळून ५ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाही जोत्याखाली गेला आहे. जवळपास ३८ मध्यम प्रकल्पात २५ टक्केपेक्षा कमी पाणीसाठा उरला आहे. त्यामध्ये बीडमधील सर्वाधिक १०, लातूर व उस्मानाबादमधील प्रत्येकी ६, औरंगाबादमधील ७, जालन्यातील ३, नांदेडमधील ४, व परभणीतील २ मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

नांदेडमधील दोन मध्यम प्रकल्पातच केवळ ५० ते ७५ टक्के दरम्यान पाणीसाठा शिल्लक आहे. हिंगोली जिल्ह्यातील २६ लघु प्रकल्‍पात सर्वात कमी केवळ ३ टक्के उपयुक्त पाणी उरले आहे. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यातील १२६ लघु प्रकल्‍पात १३ टक्के, औरंगाबादमधील ९६ प्रकल्पात १५ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्पात १४ टक्के, लातूरमधील १३२ लघु प्रकल्‍पात १८ टक्‍के, उस्मानाबादमधील २०६ व नांदेड मधील ७९ प्रकल्पात प्रत्येकी २१ टक्के व परभणीतील २२ लघु प्रकल्पात केवळ २० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

मध्यम प्रकल्पांचीही स्थिती फारशी समाधानकारक नाही. औरंगाबादमधील १६, उस्मानाबादमधील १७ मध्यम प्रकल्पात प्रत्येकी २६ टक्के, जालन्यातील ७ मध्‍यम प्रकल्‍पात २५ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात २७ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पात, २५ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पात २३ टक्के तर परभणीतील २ मध्यम प्रकल्पात केवळ १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

कोरड्या पडलेल्या लघु प्रकल्‍पाची स्थिती अशी..

औरंगाबादमधील ५, जालन्यातील १, बीडमधील ३, उस्मानाबादमधील ९ तर परभणीमधील ८ लघु प्रकल्पांचा समावेश आहे. जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघु प्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील २७, जालनामधील २८, बीडमधील ६२, लातूर व उस्मानाबादमधील प्रत्येकी २७, नांदेडमधील २४ व परभणीतील १० लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com