Farmer Doubling Income : शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाचं काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये घोषणा केली होती, की २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार! २०२२ हे वर्ष नुकतेच संपले असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का, हा खरा प्रश्‍न आहे.
Farmer Income
Farmer Income Agrowon

नवीन आर्थिक धोरणांची (Economic Policy) अंमलबजावणी केल्यावर गेल्या तीस वर्षांत अर्थव्यवस्थेचा जेवढा कायापालट झाला, तेवढा कृषी क्षेत्रावर (Agriculture Sector) मात्र सकारात्मक प्रभाव पडलेला दिसत नाही. त्यातच आता आलेल्या नव्या कायद्यांबद्दलच्या (Farm Law) उलटसुलट चर्चा जोरात आहेत. पण याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्याला किती मिळणार, याचा विचार व्हायला हवा.

शेती फायद्याची नाही, कुटुंबातील एकाने शेती व दुसऱ्याने नोकरी करावी असे विचार सुद्धा रुजायला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या बाजूला भारताची कृषिमालाची आयात (Agriculture Import) सुद्धा वाढताना दिसते आहे. तेलबिया, डाळी यांची स्वयंपूर्णता संपुष्टात येऊन आपण आयातदार देश झालो आहोत. उत्पादन ते वितरण सर्वच पातळ्यांवर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणायची गरज आहे.

Farmer Income
Farmer Income : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याचे माझ्याकडे पुरावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये घोषणा केली होती, की २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार! २०२२ हे वर्ष नुकतेच संपले असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का, हा खरा प्रश्‍न आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट की खर्च दुप्पट झाला, हा संशोधनाचा विषय आहे. यासोबतच हेही तपासून पाहण्याची गरज आहे की, प्रत्यक्षात उत्पन्न दुप्पट झाले असेल तर किती झाले.

मात्र दुप्पट उत्पन्नाच्या आश्‍वासनाची वस्तुस्थिती तपासली, तर आपल्याला काहीच दिसत नाही. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या ७७ व्या फेरीनुसार, २०१९ मध्ये शेतीतून सरासरी शेतकरी कुटुंबाचे निव्वळ मासिक उत्पन्न केवळ ८१६.५० रुपये होते. आता प्रश्‍न पडतो की सध्याची महागाई पाहता याच्या दुप्पट उत्पन्न केले असले तरीसुद्धा काय फरक पडला असता?

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी, सर्वप्रथम शेतीवरील लागवड खर्च कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतीमध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढवायला हवी. दुसरे म्हणजे कृषी उत्पादनांच्या खरेदी किमतींमध्ये अशी वाढ व्हायला हवी, की शेतकऱ्याला एक विशिष्ट स्तराचा नफा मिळावा, जेणेकरून त्याचे कुटुंब सन्मानाने जगू शकेल.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत निश्‍चित करावी. कृषी उत्पादनांमध्ये तृणधान्ये, कापूस, ऊस, भाजीपाला, फळे, फुले, फळबाग, चहा, कॉफी, मसाले, वनीकरण, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्धजन्य पदार्थ इत्यादींचा समावेश होतो, जे शेतकरी आणि शेतमजूर कच्चा माल म्हणून तयार करतात.

त्यात खर्चाच्या रूपात भांडवलाचा समावेश होतो. महागाई वाढल्याने आणि अनुदानाच्या रकमेत सातत्याने होणारी कपात यामुळे निविष्ठा खर्च प्रचंड वाढला आहे यात शंका नाही. उत्पादन प्रक्रियेद्वारे, किंमत ठरवून वस्तू तयार मालाच्या स्वरूपात निश्‍चित बाजारभावाने विकल्या जातात, ज्यातील एक महत्त्वपूर्ण भाग शेतकरी सुद्धा या वस्तू वापरतात जे स्वतः कच्च्या मालाचे उत्पादकही असतात.

Farmer Income
Farmer Income : शेतकऱ्यांना होतो डिजिटल बँकिंगचा फायदा : केंद्रीय कृषीमंत्री

कच्चा माल पक्का करून तो बाजारात विकून मिळणाऱ्या अतिरिक्त मूल्याचे प्रमाण आश्‍चर्यकारक आहे आणि हा नफा दलाल-मध्यस्थ-कॉर्पोरेट फस्त करत आहे. शेतकरी शेती व्यवसाय हे केवळ राष्ट्रीय परिघांमध्ये मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय आर्थिक भांडवलाचे रूप धारण केले आहे.

कॉर्पोरेट वर्चस्व केवळ कृषी उत्पादनांच्या किमतीतच नाही तर बियाणे, खते, कीटकनाशके इत्यादींवरही प्रस्थापित होत आहे. खरे तर शेतकरी आंदोलनाच्या दबावाखाली रद्द झालेले तीन कृषी कायदेही कृषी क्षेत्रात कॉर्पोरेटचा अखंड प्रवेश व्हावा या हेतूनेच आणले गेले होते.

एक महत्त्वाचा प्रश्‍न असा आहे, की उत्पादन, विपणन आणि वितरण या आर्थिक साखळीत कमावलेल्या प्रचंड नफ्यात उत्पादक शेतकऱ्यांचा वाटा का नसावा? भारतातील आर्थिक विषमतेची दरी आज मोठ्या प्रमाणात वाढली असून, पिकांना आणि सर्व कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किंमत देण्याच्या नावाखाली सरकार आर्थिक संसाधनांच्या उपलब्धतेची सबब दाखवू लागते.

शेतकरी मजुरांनी घेतलेले किरकोळ कर्ज परत न केल्यास त्यांच्या जमिनी व इतर मालमत्ता जप्त करण्यास वेळ लागत नाही. कांदा, लसूण, टोमॅटो, बटाटा, सफरचंद आदींची दुरवस्था उत्पादनाच्या वेळी आणि नंतर भावाच्या बाबतीत कोणापासून लपून राहिलेली नाही.

सर्व कृषी उत्पादनांपासून तयार केलेल्या मालाच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यात कच्चा माल उत्पादकाचा वाटा का नाही? तथापि, ज्या धोरणांमुळे हे शक्य होते, त्या धोरणाची निवड एका विशिष्ट आर्थिक आणि राजकीय बदलाशी निगडीत असते. हे खूप धोकादायक आहे.

याशिवाय, तीन कायदे मागे घेतल्यानंतर, किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीबाबत मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे, ज्याचे लेखी आश्‍वासन केंद्र सरकारने ९ डिसेंबर २०२१ रोजी संयुक्त किसान मोर्चाला दिले होते. मात्र यासंदर्भातील समिती स्थापनेबाबतच्या अधिसूचनेमध्ये सरकार आपल्या आश्‍वासनापासून मागे गेले. वाढता उत्पादन खर्च आणि हवामानातील अभूतपूर्व बदलांमुळे पिकांची नासाडी पाहता शेतकरी कर्जातून मुक्त होऊ शकत नाहीत.

अर्थात, सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) शेतीचा वाटा पूर्वीसारखा नाही, पण देशाच्या दोन तृतीयांश लोकसंख्येची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे, हे विसरता कामा नये. त्यामुळे शेती आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी पर्यायी मार्गाचा अवलंब न केल्यास, सबका साथ, सबका विकास या घोषणा म्हणजे बोलाचीच कढी व बोलाचीच भात ठरेल, यात शंका नाही.

- विकास मेश्राम, झरपडा, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया (७८७५५९२८००)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com