
Jaljeevan Mission Sindhudurg News : जलसंधारण प्रकल्पांच्या कामांमध्ये प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने राबवून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. जिल्ह्यातील ३९ जलसंधारण कामांची गती वाढवावी, अशा सूचना पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जलसंधारण, जलजीवन मिशन, भूसंपादन प्रक्रिया, तिलारी प्रकल्प आदींसह विविध विकासकामांचा आढावा घेतला.
या बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, शंकर बर्गे, अविशकुमार सोनोने, दिलीप पवार, सुहास गायकवाड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री चव्हाण म्हणाले, की जिल्ह्यात ३९ जलसंधारण प्रकल्पांची कामे प्रलंबित आहेत. शासनाने जलसंधारण कामांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे ज्या प्रकल्पांची कामे रखडली आहेत त्याठिकाणचे भूसंपादन करणे, शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देणे ही कामे अधिक गतीने व्हायला हवीत.
जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर कामेदेखील पूर्ण करा. जलजीवन मिशनअंतर्गत ४६५ योजनांचा ४३० कोटींचा कृती आराखडा तयार करण्यात आला होता. या सर्व योजनांने कार्यारंभ आदेश देण्यात आले असून त्यातील ४९ कामे पूर्ण झाली आहेत. काही कामे प्रगतिप्रथावर आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.