
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने कर्नाटक (Karnataka) सरकारचा धिक्कार असो, विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे, महाराष्ट्र द्रोहाला संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला. सोमवारपासून (ता.१९) राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर (Assembly Session) येथे सुरू झाले.
विरोधी पक्षाच्या या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षाचे, महाआघाडीचे सर्व आमदार आंदोलनात सहभागी झाले.
५० खोके एकदम ओके असे बॅनर विरोधी पक्षाच्या आमदारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कर्नाटक सरकार हाय हाय, ईडी सरकार हायहाय अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, अशोक चव्हाण राजेश टोपे, एकनाथ खडसे, अंबादास दानवे, नाना पटोले यांसह इतर आमदार उपस्थित होते.
आज महाराष्ट्र बेळगाव एकीकरण समितीने आयोजित मोर्च्यात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेश बंदी केल्याचा मुद्दा अंबादास दानवे यांनी सभागृहात उपस्थित केला. महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमावाद गेल्या ६१ वर्षापासून प्रलंबित आहे. कर्नाटक सरकारकडून सतत दुटप्पी भूमिका घेतली जात आहे, असा घाणघात दानवे यांनी केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.