
Kolhapur News : काळम्मावाडी धरणाच्या डावा कालव्यावरील शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच शेतीला पाणी (Agriculture Irrigation) दिले जाईल. कालव्याजवळ असणाऱ्या ओढ्याच्या ठिकाणी अस्तरीकरण होणार नाही. शेतकऱ्यांनी चिंता करू नये, अशी ग्वाही आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिली.
तुरंबे (ता. राधानगरी) येथील सिद्धिविनायक मंदिराशेजारी शेतकऱ्यांच्या बैठकीत आबिटकर बोलत होते. लढ्याला यश आल्यामुळे शेतकऱ्यांनी आमदार आबिटकर आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांचे आभार मानले.
काळम्मावाडी धरणाच्या डावा कालव्यातून पिकांना पाणी सोडले जाते. कालव्याचे अस्तरीकरण पूर्ण होताच कालव्यातून ओढ्याद्वारे सोडले जाणारे पाणी बंद होणार होते.
यामुळे दहा गावांतील शेतकऱ्यांची पिके धोक्यात होती. तिटवे, अर्जुनवाडा, तळाशी, चंद्रे, निगवेमधील शेतकऱ्यांनी बैठक घेतली होती, तर पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विनया बदामी, कल्याणी कालेकर यांची भेट घेऊन ओढ्याचे पाणी बंद करू नका, असे लेखी निवेदन दिले;
मात्र आश्वासन मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अस्तरीकरणाचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता. अधीक्षक अभियंता महेश सुर्वे म्हणाले, की ‘कालव्यावरील ओढ्याच्या ठिकाणी ३०० मीटरवर अस्तरीकरण केले जाणार नाही. पिकाचे नुकसान होणार नाही.’
यावेळी अरुण जाधव, शामराव भावके, अजित पवार, प्रभाकर पाटील उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.