
Hingoli News : सतत वादग्रस्त विधान करणारे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी (Agriculture Minister Abdul Sattar) पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्यावर वादग्रस्त विधान केले आहे. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. यावर विधीमंडळात विरोधीपक्षाने शेतकऱ्यांना मदतीची मागणी केली. मात्र यावर राज्य सरकारने मदतीचा निर्णय घेतला नाही.
शेतकरी आत्महत्यावर बोलताना कृषिमंत्री सत्तार म्हणाले, "शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत." सत्तारांच्या या असंवेदनशील वक्तव्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
राज्यात मागील आठवड्यात शेतकऱ्यांना वादळी पावसाचा फटका बसला. त्यात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी हैराण आहेत. परंतू राज्य कृषिमंत्री मात्र असंवेदनशील बोलून शेतकऱ्यांच्या दु:खावर मीठ चोळत आहेत.
पुढे सत्तार म्हणाले, "मी माझ्या मतदारसंघात फिरलो आहे. शेतकऱ्यांचे फार काही नुकसान झाले नाही. मोठं नुकसान नाही. परंतू जे नुकसान झालं त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहोत."
दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळाच्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा निषेध करत विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणा दिल्या. तसेच अब्दुल सत्तारांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी विरोधीपक्षाने केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.