
Animal heatstroke Update In Nandurbar : गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जनावरांचे हाल होत असून, या वाढत्या तापमानाचा फटका जनावरांना बसणार असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पशू संवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
शहाद्यात १ लाखाच्या आसपास पशुधन आहेत. उन्हाच्या झळांनी पशूंनाही धोका निर्माण होतो. मे महिन्यात तापमान हे ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यांचा विपरीत परिणाम हा गायी, म्हशींच्या आरोग्य, कार्यक्षमता, उत्पादकतेवर होऊ शकतो.
शरीरात या वाढलेल्या तापमानामुळे ताण येतो. त्यांचे शारीरिक तापमान (१०३ ते ११० अंश फॅरानहाइट) वाढते. जनावरांची तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक सहन क्षमता कमी पडल्यास शारीरिक तापमानात वाढ होते. एका जागी उभे राहणे, बैचेन होणे, खाली बसणे अशी लक्षणे दिसून येतात. यालाच उष्माघात म्हणतात.
वेळीच उपचार न केल्यास जनावरेही उष्माघातास बळी पडतात. सकाळी व संध्याकाळी ऊन कमी असताना जनावरे चरण्यास सोडावीत. मुबलक प्रमाणात थंड पिण्याचे पाणी द्यावे.
बैलांकडून शेतीच्या मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत. अनेकदा जागेअभावी किंवा अन्य कारणाने जनावरे दुपारच्या वेळी भर उन्हात बांधली जातात. याचा परिणाम असेही पशू संवर्धन विभागाने पशुपालकांना आवाहन केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.