Solapur Banan Loss News : करमाळा तालुक्यातील वाशिंबे परिसरात सोमवार (ता. ७) मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्यामुळे वाशिंबे शिवारातील काढणीस आलेल्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या असून, ऐन हंगामात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ ऊडाली, तसेच चारा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्या केळीला उच्चांकी दर मिळत आहे. शेतकऱ्यांनीही मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने या बागा जोपासल्या आहेत. अनेक ठिकाणी सध्या बागा फळावर आहेत.
काही ठिकाणी केळीची उतरणी सुरू आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटामुळे हिरावला आहे.
या आधीच खते, बी बियाणे, औषधे मंजुरी यात गुंतवलेले भांडवल मिळवणे, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना, या संकटाने त्यांच्या सर्व आशेवर पाणी फेरले आहे.
माळशिरस आणि मोहोळच्या काही भागांतही अशाच पद्धतीने वादळीवाऱ्याचा फटका बसला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.