Sindhudurg Fire : जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून आगीचे (Fire In Cashew Orchard) सत्र सुरूच असून गुरुवारी (ता. २३) वेत्ये (ता. सावंतवाडी) येथे काजू बागेला (Cashew Orchard) आग लागली.
या आगीत बागायतदारांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान (Cashew Crop Damage) झाले आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आली.
जिल्ह्यात आग लागून गेल्या महिना-दीड महिन्यात आंबा, काजूची १० हजारांपेक्षा अधिक झाडे जळाली आहेत. उत्पादनक्षम झाडे जळत असल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे तर काही ठिकाणी आग लावण्यामुळे हे नुकसान झाले आहे. परंतु आग लागण्याचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत.
गुरुवारी दुपारीदेखील सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथे आग लागली. या आगीत काजू बागायतदार जितेंद्र गावकर, रमेश गावकर, गणपत कदम यांची शेकडो झाडे जळाली.
उत्पादनक्षम झाडे जळाल्याने शेतकऱ्यांचे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आग विझविण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब बोलविण्यात आला होता.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.