
Beed News : तालुका परिसरात हरभरा काढणी (Chana Harvesting) सुरू असून, हंगाम अंतिम टप्यात आहे. मोंढ्यामध्ये १५ दिवसांमध्ये दीड हजार क्विंटल हरभऱ्याची आवक (Chana Arrival) झाली आहे. परंतु अद्यापही शासकीय हरभरा खरेदी केंद्र (Chana Procurement Center) सुरू नाही.
परिणामी, आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे हजार रुपये नुकसान सहन करून हरभरा विक्री करावा लागत आहे.
माजलगाव तालुक्यामध्ये रब्बी हंगामाचे ७८ हजार ८७७ हेक्टर क्षेत्र असून, यापैकी २७ हजार ८२९ हेक्टरवर रब्बीतील गहू, ज्वारी, रब्बी कांदा, रब्बी मका व हरभऱ्याची लागवड झाली.
हरभऱ्यास मिळत असलेला वाढीव दर यामुळे शेतकऱ्यांना पहिल्या पसंतीवर हरभऱ्याची जवळपास १५ हजार ७२८ हेक्टरवर पेरणी केली होती. हरभरा पीक जोमात आले होते.
परंतु वातावरणातील झालेल्या बदलांमुळे पिकांवर मोठा प्रादुर्भाव झाला. परिणामी, उत्पन्नावर परिणाम झाला असून अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमीच उत्पन्न झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सध्या हरभरा पूर्णतः वाळून काढणीस आल्याने बहुतांश शेतकरी हरभऱ्याची काढणी करत आहेत. त्याचबरोबर मळणी यंत्रातून काढणी सध्या सुरू आहे. असे असले तरी पंधरा दिवसांपासून खरेदी हंगाम सुरू झाला असून, दिवसाकाठी शंभर ते दिडशे रुपये क्विंटल आवक येथील बाजारात येत आहेत.
हमीभाव पाच हजार तीनशे दहा रुपये आहे, परंतु खासगीमध्ये चार हजार ते साडेचार हजार रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.