
Roha News : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील ग्रामीण डोंगराळ व दुर्गम (Rural Area) भागातील खासगी व सार्वजनिक विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्यासाठी (Water Stock) ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. पाणी योजना (Water Scheme) मंजूर आहे;
पण काम पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल (Water Shortage) होत आहे. त्यामुळे गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water Supply) व्हावा, अशी लेखी मागणी संतप्त ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे केली आहे.
रोहा तालुक्यातील भालगाव परिसरातील अनेक गावांना तीव्र टंचाई जाणवत आहे. या भागातील फणसवाडी गाव हे डोंगराळ व दुर्गम भागात वसलेले आहे. येथील ग्रामस्थांना प्रतिवर्षी पाण्याची भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ग्रामस्थांना विशेषतः महिलांना पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या गावाला टंचाईग्रस्त गाव घोषित केले आहे.
ग्रामस्थांना बारामाही पाणी मिळावे म्हणून प्रशासनाच्यावतीने जलजीवन योजना मंजूर करण्यात आली आहे. असे असताना योजना अद्याप पूर्ण न झाल्यामुळे यंदाही ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
ही योजना कार्यान्वित होईपर्यंत गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी पत्राद्वारे मागणी रमेश वरक, गोविंद हिरवे, महादेव शिंदे, दीपक गोरे, शागा हिरवे, अंनता महाबळे, पांडुरंग वरक, चंद्रकांत गोरे आदी ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भात आमदार अदिती तटकरे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत भालगाव व ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.