Crop Damage Survey : पंचनाम्याची कामे अद्यापही मंदावलेलीच

नुकसानाचे क्षेत्र मोठे आहे. खरीप हंगामातही शेतकऱ्यांना फटका बसला होता. आता रब्बी पीकही गेले. अशास्थितीत शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे होते.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Yavatmal News : जिल्ह्यात झालेल्या गारपीट (Hailstorm), वादळी वारा तसेच पावसाने जवळपास सात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. नुकसानीनंतर तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मात्र, अजूनही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. जिल्ह्यात शेतकरी अडचणीत आले असताना लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी वगळता एकही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नसल्याची खंत शेतकऱ्यांना आहे.

जिल्ह्यात १८ व १९ मार्चला सात तालुक्यात गारपीट झाली. पावसामुळे हजारो हेक्टरवरील गहू, हरभरा, तीळ, संत्रा, फळपिक, भाजीपाला आदी पिकांना फटका बसला. अवकाळी पावसानंतर शासनाने दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.

मात्र, अजूनही नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले असले तरी जिल्हातील एकही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेला नाही.

Crop Damage
Rain Prediction : राज्यात वादळी पावसाला पोषक हवामान

नुकसानाचे क्षेत्र मोठे आहे. खरीप हंगामातही शेतकऱ्यांना फटका बसला होता. आता रब्बी पीकही गेले. अशास्थितीत शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे होते. असे असताना एकही लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली नाही.

पुसद, महागाव, उमरखेड, दिग्रस, दारव्हा, कळंब, बाभूळगाव आदी तालुक्यात अवकाळीने मोठा तांडव घातला. अनेक शेतकऱ्यांची संत्रा बाग उद्ध्वस्त झाली.

गहू, हरभरा पूर्णपणे झोपला. हे नुकसान मोठे आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तत्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, अजूनही पंचनामे झालेले नाही.

जवळपास तीन दिवस उलटूनही ७० टक्के पंचनामे झाले आहे. कर्मचाऱ्यांचा संप मागे झाला आहे. असे असतानाही कामाला गती आलेली नाही. एकीकडे गुडीपाडव्याचा उत्साह आहे तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकऱ्यांचा आनंद हिरावलेला आहे.

Crop Damage
Nashik Stormy Rain : वादळी पावसाने साडेसात हजार हेक्टरवर धुळधाण

लोकप्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची उपेक्षा

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. काही भागात अक्षरक्ष: गारांचा पाऊस झाला. अशास्थितीत लोकप्रतिनिधीनी पाहणी करून नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करणे गरजेचे होते.

मात्र, गेल्या चार दिवसात जिल्ह्यातील एकही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्याचे दिसत नाही. प्रशासन आले असतानाही लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची उपेक्षा होताना दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com