
Sindhudurg News : गेले दोन दिवस सुरू असलेल्या वादळी वाऱ्याने होत्याचे नव्हते केले. हातातोंडाशी आलेला आंबा (Mango), काजू (Cashew) बागायतदारांचा घास या वाऱ्याने हिरावून घेतला आहे.
महिनाभरात तीनदा वादळी वाऱ्यांमुळे आंबा, काजू बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. कृषी विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जिल्ह्याच्या वातावरणात अचानक बदल होऊन दोन दिवस पहाटे तीनपासून वादळी वाऱे वाहिले. मंगळवारी (ता. ७) दहापर्यंत सोसाट्याचे वारे होते. परंतु त्यानंतर वाऱ्याची गती कमी झाली.
परंतु बुधवारी (ता. ८) पहाटे दोनपासूनच वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. या वाऱ्यामुळे आंबा, काजू बागायतदारांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
कोवळे काजू बी तर मोठ्या प्रमाणात गळून पडले आहे. काही ठिकाणी काजुच्या झाडांच्या फांद्यादेखील मोडून पडल्या आहेत. काजुच्या झाडांखाली कोवळ्या काजू बीचा खच पडल्याचे चित्र अनेक बागांमधून पाहायला मिळत आहे.
उष्णतेच्या लाटेचा अंदाज
हवामान विभागाने सिंधुदुर्गात पुढील दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज दिला आहे. सरासरीपेक्षा चार ते पाच अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.