
Raigad News : सुधागड तालुक्यात सोमवारी (ता. ६) आलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) आंबापिकाला फटका बसला आहे. मोहरांनी बहरलेले व काही ठिकाणी कैऱ्या धरलेले आंबापिक पूर्णत: धोक्यात आले आहे.
यामुळे आंबा बागायतदार संकटात सापडले आहेत. तालुका कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत सहा गावांतील सहा हेक्टरवरील आंबापिकाचे नुकसान झाले आहे.
यावर्षी आंब्याला चांगला मोहर आला होता. मात्र अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले.
जिल्ह्यातील आंबा पिकांवर अवकाळी पाऊस व हवामानातील बदल आदींबाबत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आंबा पीक विमा योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.
यंदा चांगले उत्पन्न हाती येईल, अशी परिसरातील सर्वच बागायतदार शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पाच्छापूर येथील आंबा बागायतदार संजय घोसाळकर यांनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.