
Palghar News : डहाणूपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आगर ग्रामपंचायत क्षेत्रानजीक कोळंबी प्रकल्पामुळे (Kolambi Project) भातशेतीमध्ये (paddy Farming) खारे पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेकडो एकर जमीन नापीक (Barren) होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासनाने कोळंबी प्रकल्पांना मंजुरी देताना परिसरातील भातशेती नापीक होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी भंडारी समाजातील सामाजिक कार्यकर्ते भगवान कडू यांनी केली आहे.
आगर ग्रामपंचायत क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या खाजण जमिनीत खाजगी कोळंबी प्रकल्पाला शेकडो एकर जमीन शासनातर्फे देण्यात आली आहे.
या कोळंबी प्रकल्पामुळे समुद्राच्या भरतीच्या खाऱ्या पाण्याचा पसारा परिसरात असलेल्या शेतजमिनीत वाढणार असल्यामुळे या भागातील शेतीमध्ये पावसाळी भातशेती करणे शेतकऱ्यांना कठीण होणार आहे.
या भागात सर्व्हे नंबर १४० मध्ये अनेक आदिवासी व भंडारी समाजातील अल्पभूधारक शेतकऱ्यांची भातशेती जमीन असून पूर्वपरंपार पावसाळी भातशेती केली जात आहे;
मात्र खाजण जमिनीत कोळंबी प्रकल्पाला मान्यता देण्यात येत असल्यामुळे शेतजमिनी नापीक होत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.