Agriculture Electricity : शेतीसाठी दहा तास मोफत वीज देण्याचा निर्णय लवकरच
Electricity Supply Nagpur : राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी १० तास मोफत वीज देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती मंगळवारी (ता.९) मुंबई येथे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दिली, अशी माहिती शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी सांगितली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांचा आक्रोश सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न समजून सह्याद्री अतिथिगृह, मुंबई) येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला कृषिमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दादा भुसे, आमदार ज्ञानराज चौगुले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, ‘किसान जिहादी’चे विनायकराव पाटील, शेतकरी वारकरी संघटनेचे सिकंदर शहा, कराडचे पंजाबराव पाटील, राजन शिरसागर, नेताजी पाटील, ओमप्रकाश सुरवसे, राजेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, ऋषिकेश दाळिंबे, उत्तम खबाले आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ही बैठक घडवून आणली.
समिती तयार करणार’
‘‘आम्ही शेतकऱ्यांच्या विविध समस्या मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. या समस्या सोडविण्यासाठी सरकारकडून लवकरच समिती तयार केली जाईल. यामध्ये मंत्री, अधिकारी तसेच पाच शेतकरी प्रतिनिधींचा समावेश असेल. सरकारने दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी एवढीच अपेक्षा आहे,’’ असे शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.