
Kolhapur Fertilizer News : खतांच्या किमतीत झालेली भरमसाट दरवाढ तसेच मशागतींच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. शेतीपिके तोट्यात गेल्याने आर्थिक गणित कोलमडले आहे.
असे असताना खासगी खत कंपन्यांकडून कृषी सेवा केंद्रांमधून युरिया व इतर काही खतांबरोबर लिंकिंग व इतर काही दुय्यम खते माथी मारली जात असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांना युरिया खताची गरज असते. सध्या सर्वत्र उसाच्या भरणीसह इतर कामांची धांदल सुरू आहे. शेतकरी कृषी केंद्रात जाऊन खतासाठी विचारणा केली जात आहे.
पण, युरिया उपलब्ध नाही किंवा इतर खतांच्या गोण्या किंवा कीटकनाशके घेण्याबाबत शेतकऱ्यांना सक्ती केली जाते. खरंतर शेतकऱ्यांना फक्त युरियाची गरज असते. खत कंपन्यांच्या मनमानीमुळे इतर खते शेतकऱ्यांवर लादण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक लुटीवर शासनाने चाप लावण्याची गरज आहे.
खरिपासाठी व रब्बी शेती पिकांच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर युरिया खताची गरज असते. खोडवा भरणीची कामे जोरात सुरू असून शेतकरी वर्गातून युरिया खताची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मात्र, युरिया खताची गोणी हवी असेल तर त्यासोबत लिंकिंगद्वारे अन्य खते माथी मारली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.