
Solapur Rain News : एप्रिल महिन्यात जिल्ह्यात वादळीवाऱयासह झालेल्या पावसामुळे सुमारे १ हजार ९८५ शेतकऱ्यांना फटका बसला असून, सुमारे १ हजार २०८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे त्यात नुकसान झाले आहे. तर साधारण दोन कोटी ६४ लाख ८३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे.
एप्रिल महिन्यात अतिवृष्टी, वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपीट आणि पाऊस झाला. त्या आधीही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पावसाने मोठे नुकसान केले होते. सततच्या या पावसामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. जिल्हा प्रशासनाने एप्रिलमध्ये झालेल्या नुकसानीचा अहवाल तयार केला आहे.
त्यात १ हजार ९८५ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे आणि १ हजार २०८ हेक्टरला फटका बसल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. यामध्ये उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले.
प्रामुख्याने ऊस, केळी, कांदा, भाजीपाला, पपई यासारख्या पिकांचा त्यात समावेश आहे. त्यासाठी कृषी विभागाने नुकसान भरपाईचा नजर अंदाज अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यानंतर तालुका स्तरावर तलाठ्यांमार्फत नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यात आले. आता लवकरच हा अहवाल शासनाकडे पाठवण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
मे मध्येही पुन्हा नुकसान
आता अलीकडे गेल्या आठवड्यात ८ आणि ९ मे दोन दोनदिवसात मे महिन्यातही पुन्हा पावसाने जिल्ह्यात काही भागात पिकांचे नुकसान झाले आहे. त्यातही कांदा आणि भाजीपाल्याचा समावेश अधिक आहे.
या नुकसानीचा नजरअंदाज अहवालही कृषी विभागाकडून तयार कऱण्यात येत आहे. तसेच या नुकसानीचेही पंचनामे करुन अहवाल तयार कऱण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.