रसायनी, जि. रायगड : हवामान बदलाचा परिणाम यंदा जांभूळ (Climate Change Effect In jambhul), कैरी, करवंद, काजू (Cashew) या रानमेव्यावर झाला आहे. बाजारपेठेत जांभळे दाखल झाले असले तरी आवक अत्यल्प असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
रसायनीलगत कर्नाळा किल्ल्या आणि पाताळगंगातील घेरामणिक गडाच्या डोंगररांगांत अनेक आदिवासी वाड्या आहेत. येथील आदिवासी बांधव उन्हाळ्यात जांभूळ, करवंद, कैरी, गावठी आंबे, काजू विकून उपजीविका करतात.
यंदा मात्र खराब हवामानामुळे उत्पादनावर परिणाम झाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवकाळीमुळे आंबा मोहोरावर परिणाम झाला आहे. वासांबे-मोहोपाडा बाजारपेठेत तीन-चार दिवसापासून जांभळे विक्रीसाठी येऊ लागले आहे.
मात्र आवक कमी असल्याने २०० रुपये किलो दर असल्याचे मोरबा वाडीतील नम्रता पवार विक्रेत्या महिलेने सांगितले.
आरोग्यदायी जांभळे
जांभळामध्ये ‘ब’,’क’ जीवनसत्त्वे, फॉलिक ॲसिड असते. तसेच मधुमेह, कावीळ, पंडुरोग आदी आजारांवर जांभळाचा औषधी म्हणून उपयोग करतात. जांभळाच्या सेवनाने रक्त शुद्ध होते.
याशिवाय जांभळाची पाने, फळे, बिया, मुळे आणि खोड आदी औषधोपयोगी आहेत. जांभळाच्या बिया उगाळून घामोळ्यावर लावतात. हे फळ कफ, पित्त, दाह, वायू यांचा नाश करणारे आहे. जांभळाच्या पानांचे तेल औषधी असते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.