
Parbhani News : दरवर्षी वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये मनुष्य तसेच पशुधनाची जीवित हानी होत आहे. शेतकऱ्यांसाठी प्राणघातक असलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेती व्यवसायात मोठी जोखीम निर्माण झाली आहे.
आगामी काळातील जीवित हानी टाळण्यासाठी राज्य शासनाने गांभार्यांने विचार करून तत्काळ परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये वीज कोसळण्याची पूर्वसूचना देणारी तसेच आधुनिक वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करावी यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाप्रशासनाकडे केली आहे.
वीज कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये दरवर्षी अनेक शेतकरी, पशुपालक, नागरिकांचा तसेच जनावरांचा मृत्यू होतो. परभणी जिल्ह्यात मागील आठवड्यात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये ६ व्यक्ती आणि ८ जनावरांचा मृत्यू झाला आहे.
जीवित हानी टाळण्यासाठी वीज अटकाव यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. आपत्ती व्यवस्थापन उपायोजनाअंतर्गंत परभणी जिल्ह्यात बोरवंड खुर्द, सोन्ना (ता. परभणी), मानकेश्वर (ता. जिंतूर, पिंपळदरी (ता. गंगाखेड) या चार ठिकाणी वीज अटकाव यंत्र कार्यान्वित आहेत.
परंतु, ही यंत्रणा आता कालबाह्य झाली आहे. त्यामुळे महसूल मंडल स्तरावर आधुनिक वीज अटकाव यंत्रणा कार्यान्वित करण्याचे विचाराधीन आहे. असे खांडके यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.