वैजापूर : रब्बी हंगामात (Rabi Season) ऑक्टोबरपासून ई-पीकपाहणी (E-Peek) नोंदविण्याची मोहीम सुरू झाली असून, या हंगामात १०० टक्के नोंदणी ई-पीकपाहणी अॅप्लिकेशनद्वारे (Peek Pahani App) करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. शुक्रवारपर्यंत (ता.२७) तालुक्यातील ११ हजार ४७४ शेतकऱ्यांनी पिकांची नोंद मोबाइल अॅपवर केली.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक पेरा (Crop Sowing) नोंद ई-पीकपाहणी अॅपमध्ये केली नाही. त्यांनी ३१ जानेवारीपर्यंत पिकांची नोंद करावी, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे.
महाराष्ट्र शासनाचा ई-पीकपाहणी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे.
ई-पीकपाहणी मोबाइल अॅप्लिकेशनची माहिती व जनजागृती सर्व शेतकऱ्यांना व्हावी व त्यांना स्वत: शेतातील पिकाची माहिती, गाव नमुना नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतूने वेळोवेळी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये हजारो शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
तालुक्यातील १६५ गावांत तलाठी, कृषी सहायक, पोलिस पाटील, रोजगार सेवक, रेशन दुकानदार, शेतीमित्र, कोतवाल, प्रगतशील शेतकरी, आपले सरकार सेवा केंद्र चालक, सीएससी केंद्र चालक, संग्राम केंद्र चालकांच्या माध्यमातून ई-पीकपाहणीच्या मोहिमेची व्यापक जनजागृती केली जात आहे.
ऑक्टोबर ते २७ जानेवारीपर्यंत तालुक्यातील ११ हजार ४७४ शेतकऱ्यांनी ई-पीकपाहणी मोहिमेत भाग घेत १२ हजार ९१६ हेक्टर क्षेत्रावर असलेल्या आपल्या पिकांची नोंद केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.